शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST

बीड : कोरोनाचे संकट टळलेले नसताना लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांना येणारा ताप किंवा शरीरावर ...

बीड : कोरोनाचे संकट टळलेले नसताना लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांना येणारा ताप किंवा शरीरावर येणारे पुरळ हा गोवर किंवा रुबेलासारखा घातक संसर्गजन्य आजारही असू शकतो. पूर्वी एक ते दीड वर्षापर्यंतच्या मुलांना हा आजार व्हायचा; पण आता कुठल्याही वयोगटातील मुलांना याची लागण होण्याची शक्यता वाढली आहे.

गोवर हा विषाणूंपासून होणार संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तींकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. रुबेला हादेखील विषाणूजन्य आजार असून, त्याची लक्षणेही गोवरप्रमाणेच असतात. गोवरची पहिली लस नऊ ते बारा महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटात दिली जाते. पहिल्या लसीनंतर ८५ टक्के, तर दुसऱ्या लसीमुळे ९५ टक्के प्रतिकारशक्ती वाढते.

...

...असे केले जाते निदान

१ - गोवर आणि रुबेलावर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

२- असे असले तरी आता हा आजार लहान मुलांसोबत मोठ्यांमध्येही आढळून येत आहे.

३- त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप आणि पुरळ असल्यास ते गाेवर किंवा रुबेलाचे लक्षण असू शकते.

.....

३० टक्के गोवर- रुबेलाचे लसीकरण

- एक ते दीड वर्षापर्यंतच्या बालकांना गोवर - रुबेलाचे लसीकरण केले जाते. जिल्ह्यात सरासरी ५२ हजार बालके हे एक ते दीड वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना गोवर व रुबेलाचे शंभर टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण ३० टक्के इतके आहे. कोविडमुळे या लसीकरण मोहिमेला काहीशी खीळ बसली होती.

...

...तर डॉक्टरांना दाखवा

तीव्र ताप, शरीरावर पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. पुरळ प्रथम कपाळावर, मानेवर व कानामागे येतात. नंतर ते हातापायांपर्यंत पसरतात. आठवडाभराने ते कमी होतात. यातून मेंदुज्वर, अतिसार असे आजार बळावण्याची भीती असते. क्वचितप्रसंगी गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे.

...

काळजी गरजेची

गोवरपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आजारी व्यक्तींच्या संपर्कात बालकांना येऊ देऊ नये. हात वारंवार स्वच्छ धुवावेत. सकस आहार देऊन अ जीवनसत्त्वाची कमतरता भासू देऊ नये. वेळावेळी लसीकरणदेखील महत्त्वाचे आहे. ताप, पुरळ आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

-डॉ. संजय जनावळे, बालरोगतज्ज्ञ, बीड

....