शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:37 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा : आदेशाला हरताळ

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.जिल्हा दुष्काळाच्या खाईत हरपळत असतना शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाचे पैसे जिल्ह्यातील बँकांकडून कर्जाच्या रकमेमध्ये वळते केले जात आहेत. मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा असताना बँकाकडून ही रक्कम वळती केली जात असल्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर जिल्हा बँकेमध्ये शेतकºयांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी जमा झालेल्या अनुदानाची रक्कम देखील अधिक आहे.ही रक्कम इतर बँकांमध्ये ठेव स्वरुपात ठेवल्यामुळे शेतकºयांना वेळेवर अनुदान दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत शेतकºयांचे जवळपास ८४५ कोटी रुपये अनुदान अडकले आहे. या दुष्काळी गंभीर परिस्थितीमध्ये शेतकºयांचे हाल होत असताना देखील जिल्हा बँकेकडून हा बनाव केला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बँकेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.तसेच प्रशासनाने देखील या प्रकरणी जिल्हा बँकेची व इतर बँकेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.चालू वर्षात ८४५ कोटीचे विमा व अनुदानसोयाबीनसोडून इतर कापूस,मूग,तूर,उडीद, तीळ यासर इतर पिकांच्या विम्यापोटी ३४६ कोटी ३९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम देखील कर्जातून वळती करुन घेतली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेककडे यापुर्वीच खरीप दुष्काळी अनुदानापोटी ४२८ कोटी रुपये मार्च महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत तर २०१६ अतिवृष्टी अनुदानापोटी ६८ कोटी रुपये प्रशासनाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत.यापैकी राष्ट्रीय कृत बँकेतील अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा बँकेकडून अनुदानाची रक्कम वाटप करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे. तसेच इतर बँकेतून कर्जाची रक्कम वळती केली जात आहे.आरबीआयकडून बँकांनाआदेश देण्याची गरजकर्जाच्या रकमेमधून अनुदान व विम्याची रक्कम वळती करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत असे विचारले असता, लीड बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण म्हणाले, सर्व राष्ट्रीयकृत बँकाना भारतीय रिर्झंव बँकेने पत्राद्वारे असे आदेश देण्याची आवश्यकता असते, असे पत्र प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वळती केली जाणार नाही.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र