शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

माजलगावात शेतकऱ्यांनी काढला तहसीलवर बैलगाडी मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:29 IST

शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

माजलगाव (बीड ) :  साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मुख्य मागणी सह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बैलगाडीसह सहभागी होते. 

परभणी चौकातून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौक मार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. या ठिकाणी शेतकऱ्यांनी कारखान्याविरुद्ध व प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पैसे द्यावे, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी , लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडअळीचे पैसे त्वरित देण्यात यावेत अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना देण्यात आले.  

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनTahasildarतहसीलदारSugar factoryसाखर कारखाने