शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांचा आक्रोश! साखर आयुक्त व प्रादेशिक संचालकांची उसाच्या फडात प्रतीकात्मक प्रेतयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 13:53 IST

साखर आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांच्या बाजूने नसून कारखानदारांच्या बाजूने आहेत.

माजलगाव (बीड) : जिल्ह्यातील ऊस प्रश्न आणि गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी साखर आयुक्त व प्रादेशिक संचालक यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा तालुक्यातील आनंदगाव येथे ऊसाच्या फडातून शेतकऱ्यांनी आज सकाळी काढली. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी हतबल झाल्याने टोकाचे पाऊलं उचलत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 

गेवराई तालुक्यातील शेतकर्‍याने काही दिवसांपूर्वी शेतातील ऊस पेटवून देऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे दोषी म्हणून साखर आयुक्त व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आक्रमक शेतकऱ्यांनी आज सकाळी तालुक्यातील आनंदगाव येथे साखर आयुक्त  व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. 

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या नोंदीची पावती शेतकर्‍यांना देण्यात यावी, त्याची अंमलबजावणी साखर आयुक्त कार्यालयाने केली नसल्यामुळे, तसेच 265 जातींचा शेतकर्‍यांचा ऊस साखर कारखान्याने घेऊन जावा अशी मागणी केली. 265 जातीचा ऊस शेतकऱ्यांना परवडतो. एक महिना पाणी नसले चालते, रान डुकरे खात नाही, वजनदार भरतो यासर्व कारणांमुळे कारखानदार सदरील ऊस घेऊन जात नाहीत. यामुळे साखर आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांच्या बाजूने नसून कारखानदारांच्या बाजूने आहेत. त्यामुळे नामदेव जाधवसह इतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा बळी गेला. साखर आयुक्त कार्यालय हे कोटयावधी शेतकर्‍यांचे हित बघण्यासाठी निर्माण केलेले आहे. पण शेतकर्‍यांचे ते हित पाहत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे तिरडी मोर्चा गंगाभिषण थावरे यांच्या नेत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीBeedबीड