आडत बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:24+5:302021-05-30T04:26:24+5:30
शेतकरी चिंतेत अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. कृषी ...

आडत बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी
शेतकरी चिंतेत
अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यासाठी आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सभापती, आमदार यांच्यावतीने लेखी निवेदन देऊन बाजार समितीचे व्यवहार सुरू करण्यासाठी वेळ ठरवून परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, २५ तारखेच्या आदेशात पुन्हा आडत बाजाराला लॉक ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीचा व्यवहार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आडत बाजारात होत असतो. शेतकरी शेतीमाल विकून व्यवहार करीत आसतात. शेतकरी सुगीत माल विक्री करीत असले तरी बहुतेक शेतकरी पैसा खर्च होतो म्हणून पेरणीसाठी माल शिल्लक ठेवतात. पेरणीच्या वेळी माल विक्री करून खत, बी, बियाणे खरेदी, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च हा शेती मालावर भागवतात. गेल्या महिन्यात मोंढा बाजार काही टी घालून दुपारी ११पर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणला आहे. पुन्हा कडक निर्बंध लावत आडत बाजार बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री न करता आडत दुकानात अडकून पडला आहे.
बाजार समिती सुरू करण्याबाबतचे निवेदन आ. नमिता मुंदडा व कृ.उ.बा. समितीचे सभापती गोंविंद देशमुख यांनी पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले होते. २४ मेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशात बाजार समितीला पुन्हा लॉकच आसल्याचे नमुद करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. आडत बाजार बंद आसल्यामुळे खत बि बियाणे खरेदी कसे? करावे असा प्रश्न पडला.
गेल्या महिण्यात कांही वेळ आडत सुरू होत्या. त्यामुळे मी कांही शेती माल आडत बाजारात विक्रीसाठी नेला असून राहिलेला माल ही आडत बाजारात पाठवण्याच्या तयारी होतो. पण आडत बाजार बंद केल्याने अर्धा माल दुकानात तर कांही माल घरी पडून आहे. कालच्या आदेशात पुन्हा शासनाने आडत बाजार बंदचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत.शासणाने कांही तास तरी मोंढा बाजार सुरू करण्याची परवानगी दिली तरच शेतकरी खत बि बियाणे खरेदी करू शकतील.
सुंदर शिंदे, शेतकरी
शेतकऱ्यानी दुकानात माल टाकला तोही बाजरबंदमुळे आडकला तर कांही माल घरीच राहिला आहे. शेतकरी बाजार सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. शासनाने पुन्हा शेतकऱ्याला प्रतीक्षेतच ठेवल्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने शेतकऱ्याचा विचार करून बाजार सुरु करणे गरजेचे आहे.
संजय भन्साळी,
आडत व्यापारी, अंबाजोगाई.
===Photopath===
290521\img-20210528-wa0101_14.jpg