शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:11 IST

कंपनी म्हणते येईल, कृषी विभाग म्हणतेय माहिती नाही

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी विमा भरला आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहेअद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित

बीड : जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकऱ्यांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळालेला नाही. याबाबत विचारल्यास विमा कंपनी आणि कृषी विभाग टोलवाटोलवी करीत आहेत.  दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे. काही शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे काही पिकांचा विमा मिळाला असला तरी सोयाबीनचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत शेतकरी दररोज ओरिएंन्टल इन्शुरन्स कपंनीला भेट देतात. बीडचे मुख्य शाखाधिकारी मिलींद ताकपेरे हे शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी टोलवाटोलवी करून काढता पाय घेण्यास सांगतात. कंपनीचे मुजोर अधिकारी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकरी अपेक्षेपोटी कृषी विभागाकडे धाव घेतात. कृषी विभाग आम्हाला काही माहिती नाही, कंपनीला विचारा, असे सांगून हात झटकत आहेत. दोघांच्या मध्ये मात्र शेतकरी भरडला जात आहे. कंपनी व कृषी अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीमुळे शेतकरी आता संतापले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता आंदोलनाचा पावीत्रा घेतला आहे. 

शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका...दुष्काळामुळे आगोदरच शेतकरी खचला आहे. त्यात कृषी व कंपनी हे विम्यासाठी शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतापला आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय न घेतल्याने एका शेतकऱ्याने भर रस्त्यावर एका अधिकाऱ्याला चाबकाने झोडपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका आणि तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी पीक विमा तात्काळ वाटप करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिल्याचे सांगण्यात आले.

कंपनीला नाही गांभीर्यबीडच्या मुख्य शाखेसह प्रत्येक तालुक्यात एक विमा प्रतिनिधी नियूक्त केलेला आहे. मात्र, हे प्रतिनिधी शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच उद्धट वर्तणूक देऊन अरेरावी करीत आहेत. विमा कंपनीला शेतकऱ्यांचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. आतापर्यंत भरपूर विमा दिला. लाभार्थी व रकमेची माहिती माझ्याकडे नाही. सोयाबीनचा विमा येईल. कधी येईल ते मला माहिती नाही. - मिलींद ताकपेरे, शाखाधिकारी, ओरिएंन्टल इंन्शुरंन्स कंपनी बीड

आमच्याकडे माहिती नसते. कंपनीच आम्हाला माहिती देते. - राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती