शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:11 IST

कंपनी म्हणते येईल, कृषी विभाग म्हणतेय माहिती नाही

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी विमा भरला आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहेअद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित

बीड : जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकऱ्यांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळालेला नाही. याबाबत विचारल्यास विमा कंपनी आणि कृषी विभाग टोलवाटोलवी करीत आहेत.  दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे. काही शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे काही पिकांचा विमा मिळाला असला तरी सोयाबीनचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत शेतकरी दररोज ओरिएंन्टल इन्शुरन्स कपंनीला भेट देतात. बीडचे मुख्य शाखाधिकारी मिलींद ताकपेरे हे शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी टोलवाटोलवी करून काढता पाय घेण्यास सांगतात. कंपनीचे मुजोर अधिकारी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकरी अपेक्षेपोटी कृषी विभागाकडे धाव घेतात. कृषी विभाग आम्हाला काही माहिती नाही, कंपनीला विचारा, असे सांगून हात झटकत आहेत. दोघांच्या मध्ये मात्र शेतकरी भरडला जात आहे. कंपनी व कृषी अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीमुळे शेतकरी आता संतापले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता आंदोलनाचा पावीत्रा घेतला आहे. 

शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका...दुष्काळामुळे आगोदरच शेतकरी खचला आहे. त्यात कृषी व कंपनी हे विम्यासाठी शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतापला आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय न घेतल्याने एका शेतकऱ्याने भर रस्त्यावर एका अधिकाऱ्याला चाबकाने झोडपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका आणि तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी पीक विमा तात्काळ वाटप करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिल्याचे सांगण्यात आले.

कंपनीला नाही गांभीर्यबीडच्या मुख्य शाखेसह प्रत्येक तालुक्यात एक विमा प्रतिनिधी नियूक्त केलेला आहे. मात्र, हे प्रतिनिधी शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच उद्धट वर्तणूक देऊन अरेरावी करीत आहेत. विमा कंपनीला शेतकऱ्यांचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. आतापर्यंत भरपूर विमा दिला. लाभार्थी व रकमेची माहिती माझ्याकडे नाही. सोयाबीनचा विमा येईल. कधी येईल ते मला माहिती नाही. - मिलींद ताकपेरे, शाखाधिकारी, ओरिएंन्टल इंन्शुरंन्स कंपनी बीड

आमच्याकडे माहिती नसते. कंपनीच आम्हाला माहिती देते. - राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती