शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सोयाबीन, कपाशी पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

संतोष स्वामी दिंद्रुड : सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागत असून, कापूस व सोयाबीन ही पिके आता ...

संतोष स्वामी

दिंद्रुड : सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागत असून, कापूस व सोयाबीन ही पिके आता पिवळी पडू लागली आहेत. पावसामुळे मशागतीची कामे करता येत नसल्याने पिकांची दुरवस्था झाली आहे. ही परिस्थिती दिंद्रुड परिसरातील सर्व गावांत तसेच जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. मृग नक्षत्रातील झालेल्या पेरण्यांनंतर बरेच दिवस पावसाने उघडीप दिली होती. यादरम्यान ज्या शेतक-याला मजूर उपलब्ध झाले, त्यांनी मशागतीची कामे खुरपणी, वकरणी, कोळपणी, खत पेरणी करून घेतली. परंतु बहुतांश शेतक-यांना मजूर वेळेत मिळाले नाही. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. अनेकांची कामे अर्धवट राहिली आहेत. कापूस, सोयाबीची पिके अतिवृष्टीने पिवळी पडू लागली आहेत. तसेच या पिकांची वाढ खुंटली आहे.

परिणामी उत्पन्नावर परिणाम हाेण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अतिवृष्टी अशीच होत राहिली, तर सगळे पिके वाया गेल्या शिवाय राहणार नाहीत. शासन प्रशासनाने पिकांच्या नुकसानीबाबत दखल घेऊन पिकांचे पंचनामे करायला हवेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

लवणाच्या रानाचं झालंय तळं

ज्या शेतक-यांचे शेत लवणात आहे किंवा ज्यांच्या शेतातून वगळ गेली आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही, अशा शेताचं तळ झालं आहे. तलावाचे स्वरूप या शेतजमिनींना आले आहे. यामुळे उगवलेल्या पिकांची पाण्यात नासाडी होत असताना दिसत आहे.

चौकट-

मोठ्या कष्टाने पेरलेले कापूस व सोयाबीन या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी व गतवर्षीचा पीकविमा तात्काळ वाटप करून आर्थिक संकटात आधार द्यावा. - पांडुरंग झोडगे, शेतकरी, नाकलगाव

230721\img_20210723_180728_14.jpg