शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

आत्महत्यांचे सत्र थांबेना; बीड, हिंगोली जिल्ह्यांतील आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 3:54 PM

मराठवाड्यात चार दिवसांत १२ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

बीड/औंढा नागनाथ/सेनगाव (जि.हिंगोली) : मराठवाड्यातील  बीड व हिंगोली जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले. गेल्या चार दिवसांचा विचार केला तर आत्महत्यांचा हा आकडा आता १२ वर पोहोचला आहे.

बीड जिल्ह्यातील आम्ला वाहेगाव (ता. गेवराई) येथील शेतकरी रामनारायण खेत्रे (४२) यांनी बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज माफ न झाल्यामुळे ते चिंतेत होते. त्यातच अतिवृष्टीने उरल्या-सुरल्या अपेक्षाही भंगल्या यामुळे त्यांनी रविवारी आत्महत्या केली. तलवाडा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील शेतकरी अरुण मारोती शिंदे (३०) यांनी २६ आॅक्टोबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोसायटीचे कर्ज फेडण्याची चिंता असतानाच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले. 

तिसऱ्या घटनेत  हिंगोली जिल्ह्यातील वाळकी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी संभाजी लक्ष्मण मुकाडे (६५) यांनी कर्ज परतफेड न करता आल्याने शेतातील जांबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर खाजगी बँकांचेही कर्ज होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.  मुकाडे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

चौथ्या घटनेत केलसूला (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पिराजी चव्हाण (३५) यांनी कर्ज फेडायच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. १२ नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला. अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. चव्हाण यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. 

शेतकरी फार मोठ्या आर्थिक अरिष्ट्यात सापडले असून अतिवृष्टीपासून दिवसेंदिवस आत्महत्यांचे सत्र वेगाने सुरू झाले आहे. सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावर कशीतरी जगविलेली पिके पुर्णपणे पाण्यात गेली असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा