प्रत्येकाने जलसाक्षर होणे काळाची गरज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:55+5:302021-07-04T04:22:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यात कमी पाऊस होतो. यासाठी जलसंवर्धन व जलपुनर्भरण याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने जलसाक्षर होणे ...

प्रत्येकाने जलसाक्षर होणे काळाची गरज - A
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यात कमी पाऊस होतो. यासाठी जलसंवर्धन व जलपुनर्भरण याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने जलसाक्षर होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. व्ही. पवार यांनी केले. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने २ जुलैला एकदिवसीय ऑनलाईन भूजल सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी पवार बोलत होते. जलसाक्षरता, जलपुनर्भरण पद्धती, पाण्याचा उपसा, भूजलपातळीचे मोजमाप, आदी बाबींची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ होते. कार्यक्रमास उपप्राचार्य एम. ए. जोगडे, उपप्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे, कार्यक्रमाचे संयोजक विस्तार विभागाचे डॉ. संजय जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. सुनील साठे यांनी आभार मानले.