शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अखेर कोळगाव ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:17 IST

तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शाळेच्या संदर्भातील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेची इमारत ही जुनी झाली असून, मोडकळीस आली आहे. ही इमारत वापरास योग्य नसल्याचा अहवाल देवूनही प्रशासनाकडून नवीन इमारत मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळेला संरक्षण भिंत नसल्याने प्रांगणाचा शौचासाठी वापर होत आहे.परिणामी शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेसाठी नवीन इमारत, संरक्षक भिंत आदी मागण्यासंदर्भात पाठपुरावा करुनही तीन वर्षांपासून आंदोलन करु नही समस्या मार्गी लागल्या नाहीत. तसेच आठ दिवसांपूर्वी शाळेसमोर शालेय समिती अध्यक्ष रमेश करांडे व ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन ग्रामस्थांनी स्वत:हून मागे घेतले होते.यानंतर तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला दिला होता. तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मंगळवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी रमेश करांडे, उपाध्यक्ष प्रकाश येडे, गोविंद रासकर, रमेश टाकसाळ, अमोल बनसोडे, रमेश टाकसाळ, गोरख जोगदंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाagitationआंदोलन