शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:18 IST

खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण अत्याल्प राहिल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिके शेवटच्या घटका मोजत आहे. यावर्षी सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस देखील काही तालुक्यात झाला आहे. खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत. तसेच पिकाने देखील मान टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.बीड जिल्ह्यातील संपूर्ण अर्थव्यवस्था ही कापूस व सोयबीन या नगदी पिकांवर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ व यावर्षी देखील पावसाची ओढ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच आर्थिक व मानसिक दृष्ट्या शेतकरी खचून जात आहे. तुरळक पावसावर शेतक-यांनी हंगामाच्या सुरुवातीला पेरण्या उरकल्या होत्या, त्यानंतर थोड्या-फार पावसावर पिके देखील आले मात्र, सोयाबीन पिक ऐन बहरात असताना मागील आठवड्यापासून पावसाचा थेंब देखील पडला नसल्यामुळे पिकाने माना टाकल्या आहेत.ही पिके जगवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहे. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे त्याच्या कष्टाचे चीज होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाअभावी पिकांवर किड व बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव देखील वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आस्मानी संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ शेतक-यांवर येणार आहे.पावसाची अपेक्षा शेतक-यांना असल्यामुळे पिकांवर झालेल्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी किटकनाशक फवारली जात आहेत. परंतु, त्याची मात्रा देखील लागू होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पीक पदरी पडण्याची अपेक्षा नसताना देखील ते जगवण्यासाठी धडपड व खर्च केल्यामुळे हा आतभट्याचा व्यवाहार होत असल्याचे मत शेतक-यांमधून व्यक्त केले जात आहे.कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ करावाजिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातारवण तयार होत आहे. मात्र, पाऊस पडत नाही. त्यामुळे शासनाने बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल त्या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ कारवा अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत- करपेपुढील दोन ते तीन दिवसात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सोयबीन हे पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे कारवी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात