शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:18 IST

खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण अत्याल्प राहिल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिके शेवटच्या घटका मोजत आहे. यावर्षी सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस देखील काही तालुक्यात झाला आहे. खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत. तसेच पिकाने देखील मान टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.बीड जिल्ह्यातील संपूर्ण अर्थव्यवस्था ही कापूस व सोयबीन या नगदी पिकांवर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ व यावर्षी देखील पावसाची ओढ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच आर्थिक व मानसिक दृष्ट्या शेतकरी खचून जात आहे. तुरळक पावसावर शेतक-यांनी हंगामाच्या सुरुवातीला पेरण्या उरकल्या होत्या, त्यानंतर थोड्या-फार पावसावर पिके देखील आले मात्र, सोयाबीन पिक ऐन बहरात असताना मागील आठवड्यापासून पावसाचा थेंब देखील पडला नसल्यामुळे पिकाने माना टाकल्या आहेत.ही पिके जगवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहे. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे त्याच्या कष्टाचे चीज होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाअभावी पिकांवर किड व बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव देखील वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आस्मानी संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ शेतक-यांवर येणार आहे.पावसाची अपेक्षा शेतक-यांना असल्यामुळे पिकांवर झालेल्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी किटकनाशक फवारली जात आहेत. परंतु, त्याची मात्रा देखील लागू होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पीक पदरी पडण्याची अपेक्षा नसताना देखील ते जगवण्यासाठी धडपड व खर्च केल्यामुळे हा आतभट्याचा व्यवाहार होत असल्याचे मत शेतक-यांमधून व्यक्त केले जात आहे.कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ करावाजिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातारवण तयार होत आहे. मात्र, पाऊस पडत नाही. त्यामुळे शासनाने बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल त्या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ कारवा अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत- करपेपुढील दोन ते तीन दिवसात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सोयबीन हे पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे कारवी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात