अहमदनगर - जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:31+5:302021-06-03T04:24:31+5:30
अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या ...

अहमदनगर - जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे रडारवर
अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस विनापरवानगी नियमबाह्य अनधिकृत असलेले अतिक्रमण प्रशासनाच्या रडारवर आली असून ते काढण्यासाठी अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाने २ जून रोजी नाेटीस बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली. चिंचपूर ते मेहकरी फाटा या ३७ किलोमीटर अंतरातील सर्व अतिक्रमणधारकांना या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे आष्टी शहरातील दुकानदारांची दुकाने रिकामी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील रस्त्याच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम व पत्र्याचे दुकाने अतिक्रमण व विना परवानगी नियमबाह्य बांधकाम त्वरित काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने या अतिक्रमणधारकांना तोंडी व समक्ष सूचना या अगोदर दिलेल्या होत्या. २ जून रोजी परत त्यांना लेखी नोटीस दिल्या आहेत. चिंचपूर ते आष्टी येथील अनधिकृत बांधकाम हे सरकारी जागेतील असल्याने ही नोटीस मिळाल्यापासून एका दिवसात काढून घ्यावे, अन्यथा या खात्यामार्फत सदरचे बांधकाम ३ जूनपासून काढण्यात येईल आणि त्याचा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगर येथील उपविभागीय अभियंता डी एन तारडे यांनी सांगितले.
या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम पूर्ण झाले असून अतिक्रमणे काढावी लागणार असून या अतिक्रमणधारकांना या अगोदर तोंडी व समक्ष सूचना दिल्या होत्या त्यांना परत बुधवारी प्रत्यक्ष लेखी नोटीस दिल्या आहेत. त्यांनी एका दिवसात आपले अतिक्रमण काढून घ्यावे नसता गुरूवार पासून अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
- संतोष काळे, शाखा अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, अहमदनगर.
आमच्या वडिलोपार्जित मालकी हक्कातील जागेचा ही नोटीसमध्ये अतिक्रमण असा उल्लेख केला असून मालकी हक्कातील जागेच्या बद्दल काही नमूद न करता नोटीस दिली आहे. त्यामुळे मालकी हक्कातील जागेमधील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी - कल्याण निकाळजे ,भीमनगर आष्टी.
आम्हाला नोटीस देऊन एका दिवसात दुकान रिकामी करण्याचे सांगितले आहे, एका दिवसात ते शक्य नाही. त्यामुळे कमीत कमी आम्हाला अजून काही दिवसांचा वेळ वाढवून देण्यात यावा . - सलीम पठाण, दुकान धारक, आष्टी.
===Photopath===
020621\img_20210602_144904_14.jpg