शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘शिक्षणातून नैतिकता नव्हे, तर प्रेरणा गायब’ ; साहित्य संमेलनात १९७५ नंतरच्या शिक्षणपद्धतीवर परिसंवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 2:36 PM

नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ठळक मुद्देग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ हा परिसंवाद झाला या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

- मयूर देवकर

अंबाजोगाई : नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. आजच्या शिक्षणपद्धतीचे विश्लेषण करताना शशिकांत पाटील यांनी पुस्तकी शिक्षण कसे कुचकामी ठरतेय हे सांगितले. ‘आज आपण विद्यार्थ्याला पुस्तकी आणि केवळ माहिती देणारे शिक्षण देतोय. ज्ञानार्जनाची वृत्ती त्यामध्ये नाही. केवळ पैसा कमविण्यासाठी शिक्षण घेतले जात असल्याने नैतिक मुल्ये रुजण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्याला स्वावलंबी करणारे शिक्षण हवे,’ अशी त्यांनी मांडणी केली.

गणेश मोहिते म्हणाले की, शाळेत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आणि घरी आईबहिणीला मिळणारी दुय्यम वागणूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देणारे शिक्षकच जेव्हा नवरात्रीदरम्यान नऊ दिवस अनवाणी शाळेत येऊ लागतात तेव्हा विद्यार्थ्यांना काय नैतिकता शिकवायची? त्यामुळे हरवणार्‍या मूल्यांसाठी शिक्षणाला जबाबदार ठरविण्याऐवजी समाजाचे होणारे पतन रोखणे गरजेचे आहे. समाजातील दांभिकपणावर आसूड ओढून समाजाची वर्तणूक बदलणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार एल्लावाड यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्यवसायाला नैतिकता का असू नये?१९७५ नंतर १०+२+३ अशी शिक्षणरचना स्वीकारल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण वाढले. बारावीनंतरच्या शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने खासगी क्लासेसची समांतर शिक्षणपद्धती फोफावली.शिक्षणातून नैतिक मूल्ये नाही तर प्रेरणा गायब झाली. संस्थाचालक राजकीय प्रेरणेतून शिक्षणसम्राट झाले.शिक्षणाचा बाजार मांडला गेला. पण व्यवसायाला नैतिकता का असू नये? असा सवाल वृंदा देशपांडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य