शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

‘शिक्षणातून नैतिकता नव्हे, तर प्रेरणा गायब’ ; साहित्य संमेलनात १९७५ नंतरच्या शिक्षणपद्धतीवर परिसंवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 14:38 IST

नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ठळक मुद्देग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ हा परिसंवाद झाला या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

- मयूर देवकर

अंबाजोगाई : नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. आजच्या शिक्षणपद्धतीचे विश्लेषण करताना शशिकांत पाटील यांनी पुस्तकी शिक्षण कसे कुचकामी ठरतेय हे सांगितले. ‘आज आपण विद्यार्थ्याला पुस्तकी आणि केवळ माहिती देणारे शिक्षण देतोय. ज्ञानार्जनाची वृत्ती त्यामध्ये नाही. केवळ पैसा कमविण्यासाठी शिक्षण घेतले जात असल्याने नैतिक मुल्ये रुजण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्याला स्वावलंबी करणारे शिक्षण हवे,’ अशी त्यांनी मांडणी केली.

गणेश मोहिते म्हणाले की, शाळेत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आणि घरी आईबहिणीला मिळणारी दुय्यम वागणूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देणारे शिक्षकच जेव्हा नवरात्रीदरम्यान नऊ दिवस अनवाणी शाळेत येऊ लागतात तेव्हा विद्यार्थ्यांना काय नैतिकता शिकवायची? त्यामुळे हरवणार्‍या मूल्यांसाठी शिक्षणाला जबाबदार ठरविण्याऐवजी समाजाचे होणारे पतन रोखणे गरजेचे आहे. समाजातील दांभिकपणावर आसूड ओढून समाजाची वर्तणूक बदलणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार एल्लावाड यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्यवसायाला नैतिकता का असू नये?१९७५ नंतर १०+२+३ अशी शिक्षणरचना स्वीकारल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण वाढले. बारावीनंतरच्या शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने खासगी क्लासेसची समांतर शिक्षणपद्धती फोफावली.शिक्षणातून नैतिक मूल्ये नाही तर प्रेरणा गायब झाली. संस्थाचालक राजकीय प्रेरणेतून शिक्षणसम्राट झाले.शिक्षणाचा बाजार मांडला गेला. पण व्यवसायाला नैतिकता का असू नये? असा सवाल वृंदा देशपांडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य