शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षणातून नैतिकता नव्हे, तर प्रेरणा गायब’ ; साहित्य संमेलनात १९७५ नंतरच्या शिक्षणपद्धतीवर परिसंवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 14:38 IST

नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ठळक मुद्देग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ हा परिसंवाद झाला या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

- मयूर देवकर

अंबाजोगाई : नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्‍या परिसंवादातून समोर आला. 

ग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. आजच्या शिक्षणपद्धतीचे विश्लेषण करताना शशिकांत पाटील यांनी पुस्तकी शिक्षण कसे कुचकामी ठरतेय हे सांगितले. ‘आज आपण विद्यार्थ्याला पुस्तकी आणि केवळ माहिती देणारे शिक्षण देतोय. ज्ञानार्जनाची वृत्ती त्यामध्ये नाही. केवळ पैसा कमविण्यासाठी शिक्षण घेतले जात असल्याने नैतिक मुल्ये रुजण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्याला स्वावलंबी करणारे शिक्षण हवे,’ अशी त्यांनी मांडणी केली.

गणेश मोहिते म्हणाले की, शाळेत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आणि घरी आईबहिणीला मिळणारी दुय्यम वागणूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देणारे शिक्षकच जेव्हा नवरात्रीदरम्यान नऊ दिवस अनवाणी शाळेत येऊ लागतात तेव्हा विद्यार्थ्यांना काय नैतिकता शिकवायची? त्यामुळे हरवणार्‍या मूल्यांसाठी शिक्षणाला जबाबदार ठरविण्याऐवजी समाजाचे होणारे पतन रोखणे गरजेचे आहे. समाजातील दांभिकपणावर आसूड ओढून समाजाची वर्तणूक बदलणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार एल्लावाड यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्यवसायाला नैतिकता का असू नये?१९७५ नंतर १०+२+३ अशी शिक्षणरचना स्वीकारल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण वाढले. बारावीनंतरच्या शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने खासगी क्लासेसची समांतर शिक्षणपद्धती फोफावली.शिक्षणातून नैतिक मूल्ये नाही तर प्रेरणा गायब झाली. संस्थाचालक राजकीय प्रेरणेतून शिक्षणसम्राट झाले.शिक्षणाचा बाजार मांडला गेला. पण व्यवसायाला नैतिकता का असू नये? असा सवाल वृंदा देशपांडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य