शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

ढगाळ वातावरणामुळे बीड जिल्ह्यात तूर उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:13 AM

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या ...

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या तुरकळ सरींमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी साधी फवारणी केल्यास उत्पादनातील घट टाळता येणार आहे. दरम्यान, ज्वारीसाठी हे वातावरण फायद्याचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

चार दिवसांपासून थंडी नसल्यासारखीच आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. याचा बहरात आलेल्या तुरीला फटका बसेल की काय? याची चिंता शेतकºयांना लागली आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली असून, दमदार पावसामुळे तुरीचे पीक जोमात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पोखरणा-या या अळीमुळे पिकांना फटका बसू शकतो, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. तुरीबरोबरच पालेभाज्यांच्या पिकांनाही फटका बसू शकतो. तसेच फळबागांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेषत: तूर सोडल्यास कीड रोगाचा इतर रोगांना धोका नसल्याच कृषीक्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

तुरीची उंची वाढल्यामुळे फवारणीवेळी शेतकºयांनी काळजी घ्यावी, आवश्यक उपाय करावेत, फवारणीबाबत कृषी विभागाने मागील आठवड्यापासून पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कमीत कमी औषधाची साधी फवारणी केल्यास अळीचा प्रादुर्भाव व उत्पादनातील घट देखील टाळता येईल, असे कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व्ही.एन. मिसाळ म्हणाले.