शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळप्रश्नी सरकारशी दोन हात करणार -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:10 IST

बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासन, प्रशासन गंभीर नाही, उपाय करा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.मंगळवारी जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाभरातील नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले. चर्चा करुन निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी निवेदन केले. मुंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची बीड येथे चार तास बैठक झाल्यानंतर प्रशासन तातडीने कामाला लागेल, जिल्ह्याचे चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र प्रशासन काहीच करत नसल्याचे मुंडे म्हणाले. खरीप व रबी दोन्ही हंगाम वाया गेले. दुष्काळ जाहीर करुन दीड महिना झाला. दुष्काळप्रश्नी प्रथमत: कराव्या लागणाºया आठ आदेशांचे पालन सरकार व प्रशासनाकडून होत नसल्याचे ते म्हणाले. आॅगस्ट, सप्टेंबरमधील बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना आता मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे सध्या गरज असलेल्या टॅँकरच्या प्रस्तावांना कधी मंजुरी मिळेल हे सांगता येत नाही. टॅँकर सुरु करण्यासाठी २४ तासात परवानगी देण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे मुंडे म्हणाले. २०१५-१६ व २०१६-२०१७ मधील अधिग्रहणाचा निधी संबंधितांना मिळाला नसल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना ५० हजार रुपये तर फळबाग उत्पादक शेतकºयांना एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन दावणीला किंवा छावणीला कसाही चारा उपलब्ध करणे आवश्यक होते, कुठलाही निर्णय होत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. दुष्काळजन्य स्थितीत विंधन विहिरींची कामे झाली नसून एमआरइजीएस आराखड्याला मंजुरी दिलेली नसल्याचे ते म्हणाले. यातच रेशनवरील धान्याचा ७५ टक्के कोटा कमी केल्याचे सांगून मुंडे यांनी कॅनाल व तळ्याशेजारचा ऊस वाळत असल्याने तत्काळ पंचनामे करावेत, शेतकºयांचे वीज पंपाचे कनेक्शन तोडू नये, मागणीप्रमाणे एमआरईजीएस अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याचा आराखडा तयार करुन कामे सुरु करावीत, नादुरुस्त, अर्धवट बंधाºयाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांच्यावरही टीका केली.या पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, सभापती अशोक डक, जि. प. सदस्य सतीश शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, महिला आघाडीच्या रेखा फड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.कर्जमाफी फसवीमध्य प्रदेशातील कर्जमाफी व महाराष्टÑातील कर्जमाफीबद्दल विचारले असता, मुंडे म्हणाले हा दोन विद्यार्थ्यांमधील फरक आहे. राज्याचे मुख्यमंत्री दीर्घकाळ कर्जमाफीचा अभ्यास करत होते. घोषणा होऊन दीड वर्ष झालेतरी सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही.शेतकºयांना मदत करायची नाही ही भूमिका असल्याने सरकारची कर्जमाफी फसवी असून इच्छाशक्ती नसल्याचे ते म्हणाले.केंद्राची दुष्काळ संहिता क्लिष्टएका प्रश्नाच्या उत्तरात धनंजय मुंडे म्हणाले, दुष्काळासंदर्भात केंद्राची २०१६ ची दुष्काळ संहिता क्लिष्ट असून हे गणित कोणीही सोडवू शकणार नाही. केंद्र सरकारच्या निकषात काही बाबी बसत नसल्याने २०० तालुक्यांमध्ये राज्य सरकारला स्वनिधीतून कामे करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी धारुर, वडवणी, बीड तालुक्यात संपादीत जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रफळ ताब्यात घेतले जात असल्याच्या तक्रारी संबंधितांनी केल्याचे सांगून मुंडे म्हणाले, जेवढी जमीन संपादित करण्यासाठी संमती, मोजणी झाली तेवढीच जमीन ताब्यात घ्यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडे