शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

दुष्काळप्रश्नी सरकारशी दोन हात करणार -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:10 IST

बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासन, प्रशासन गंभीर नाही, उपाय करा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.मंगळवारी जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाभरातील नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले. चर्चा करुन निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी निवेदन केले. मुंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची बीड येथे चार तास बैठक झाल्यानंतर प्रशासन तातडीने कामाला लागेल, जिल्ह्याचे चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र प्रशासन काहीच करत नसल्याचे मुंडे म्हणाले. खरीप व रबी दोन्ही हंगाम वाया गेले. दुष्काळ जाहीर करुन दीड महिना झाला. दुष्काळप्रश्नी प्रथमत: कराव्या लागणाºया आठ आदेशांचे पालन सरकार व प्रशासनाकडून होत नसल्याचे ते म्हणाले. आॅगस्ट, सप्टेंबरमधील बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना आता मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे सध्या गरज असलेल्या टॅँकरच्या प्रस्तावांना कधी मंजुरी मिळेल हे सांगता येत नाही. टॅँकर सुरु करण्यासाठी २४ तासात परवानगी देण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे मुंडे म्हणाले. २०१५-१६ व २०१६-२०१७ मधील अधिग्रहणाचा निधी संबंधितांना मिळाला नसल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना ५० हजार रुपये तर फळबाग उत्पादक शेतकºयांना एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन दावणीला किंवा छावणीला कसाही चारा उपलब्ध करणे आवश्यक होते, कुठलाही निर्णय होत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. दुष्काळजन्य स्थितीत विंधन विहिरींची कामे झाली नसून एमआरइजीएस आराखड्याला मंजुरी दिलेली नसल्याचे ते म्हणाले. यातच रेशनवरील धान्याचा ७५ टक्के कोटा कमी केल्याचे सांगून मुंडे यांनी कॅनाल व तळ्याशेजारचा ऊस वाळत असल्याने तत्काळ पंचनामे करावेत, शेतकºयांचे वीज पंपाचे कनेक्शन तोडू नये, मागणीप्रमाणे एमआरईजीएस अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याचा आराखडा तयार करुन कामे सुरु करावीत, नादुरुस्त, अर्धवट बंधाºयाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांच्यावरही टीका केली.या पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, सभापती अशोक डक, जि. प. सदस्य सतीश शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, महिला आघाडीच्या रेखा फड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.कर्जमाफी फसवीमध्य प्रदेशातील कर्जमाफी व महाराष्टÑातील कर्जमाफीबद्दल विचारले असता, मुंडे म्हणाले हा दोन विद्यार्थ्यांमधील फरक आहे. राज्याचे मुख्यमंत्री दीर्घकाळ कर्जमाफीचा अभ्यास करत होते. घोषणा होऊन दीड वर्ष झालेतरी सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही.शेतकºयांना मदत करायची नाही ही भूमिका असल्याने सरकारची कर्जमाफी फसवी असून इच्छाशक्ती नसल्याचे ते म्हणाले.केंद्राची दुष्काळ संहिता क्लिष्टएका प्रश्नाच्या उत्तरात धनंजय मुंडे म्हणाले, दुष्काळासंदर्भात केंद्राची २०१६ ची दुष्काळ संहिता क्लिष्ट असून हे गणित कोणीही सोडवू शकणार नाही. केंद्र सरकारच्या निकषात काही बाबी बसत नसल्याने २०० तालुक्यांमध्ये राज्य सरकारला स्वनिधीतून कामे करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी धारुर, वडवणी, बीड तालुक्यात संपादीत जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रफळ ताब्यात घेतले जात असल्याच्या तक्रारी संबंधितांनी केल्याचे सांगून मुंडे म्हणाले, जेवढी जमीन संपादित करण्यासाठी संमती, मोजणी झाली तेवढीच जमीन ताब्यात घ्यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडे