शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दुष्काळाची काळजी करू नका; खजिना रिता करू : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:40 IST

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करू

गोपीनाथ गड ( बीड ) : गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू अशी ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गड येथे दिली. 

परळी, तालुक्यातील पांगरी येथील गोपिनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच अनुयायांची गर्दी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाड्यातील सेना-भाजप युतीच्या नवनियुक्त खासदारांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील भाजपच्या यशात गोपीनाथ मुंडे यांचा वाटा आहे. मुंडे- महाजन यांच्या पायाभरणीमुळे राज्यात पक्षाला हे यश मिळाले. आम्हाला मुंडे साहेबांनी घडवले आहे. तसेच पंकजा आणि प्रीतम मुंडे या सामन्यांसाठी काम करत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारत आहेत असेही ते म्हणाले.  

मराठवाडा दुष्काळ मुक्त करू गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.यासाठी वाटर ग्रीड आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणणे असे प्रकल्प मराठवाड्यात राबविण्यात येणार आहेत. सध्या भीषण दुष्काळ पडला असून याला घाबरण्याचे कारण नाही, दुष्काळ निवारणासाठी शासनाच्या खजिना रिता करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडdroughtदुष्काळ