शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

संपूर्ण प्लास्टिक बंदी नको; व्यापारी महासंघाच्या वतीने बीडमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:26 IST

शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी व्यापारी महासंघातर्फे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेताना राज्यातील व्यापारी महासंघ अथवा संघटनेशी चर्चा केली नाही, त्यांचे मत विचारात घेतले नाही. या निर्णयामुळे किराणा, हॉटेल, धान्य, स्विट होम, फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, महिला गृह उद्योग, गारमेंट इंडस्ट्रीज, साडी-ड्रेस मटेरिअल, स्टेशनरी, कटलरी, बेकरी चालक व इतर क्षेत्रातील घटकांवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.

हा निर्णय एकतर्फी असल्याच्या निषेधार्थ येथील डीपी रोडवरील एसबीआय बॅँकेपासून जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अरुण बरकसे, संतोष टवाणी, सूरज लोहिया, बाळू सोहनी, मन्मथअप्पा हेरकर, विनोद ललवाणी, अमित सिकची, शकील भाई नसीर भाई, प्रितेश ललवाणी, कैलास जाजू, प्रमोद निनाळ, राजू तापडिया, दत्तप्रसाद तापडिया, वर्धमान खिंवसरा, राजेश कासट, महेश सिकची, राजेश राठी, नागेश मिटकरी, नंदलाल मानधने, गंगाबिशन करवा, भगीरथ चरखा, बालाप्रसाद जाजू, जयनारायण अग्रवाल, संजय बरगे (गेवराई), सुरेंद्र रुपकर, विनायक मुळे, विजयकुमार अंडील, किसनराव माने (वडवणी), माजलगावचे संतोष आबड, अनंत रुद्रवार, धनराज बंब, सुरेंद्र रेदासनी, अंबाजोगाईचे ईश्वर लोहिया, दत्तप्रसाद लोहिया, दामोदर भांगडीया आदी व्यापाºयांचा मोर्चात सहभाग होता. आदर्श मार्केट व्यापरी संघासह इतर संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दिला. व्यापाºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

कमी जाडीवर बंदी घालाप्रदूषण न होणाºया प्लास्टीकवर बंदी नको, सरकारने निर्णयाआधी व्यापाºयांना विचारात घेणे महत्वाचे होते असे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल म्हणाले. पर्यावरणाच्या नावाखाली बंदी अन्यायकारक असून प्लास्टिक क्षेत्रातील अडीच हजार कारखाने आहेत. त्यामुळे बंदीनंतर एक लाख कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घालावी अशी शासनाकडे मागणी करत महाराष्टÑ चेम्बर आॅफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी यांनी प्लास्टिक कचरा विल्हेवाटीवरही व्यापाºयांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले.

परिणामांची दिली माहितीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यावर प्लास्टीक डिस्पोजल व्यापारी संघटनेचे अमित सिकची यांनी प्लास्टिकवर संपूर्ण बंदी कशी अयोग्य आहे. विविध घटकांवरील परिणाम, शासन महसूलचे नुकसान याबाबत माहिती दिली. कागद निर्मितीसाठी झाडांचा वापर करावा लागेल त्यामुळे पर्यावरणाचेच नुकसान होईल. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट २०१६ लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

असे होते घोषफलकप्लास्टिक मित्र आहे, शत्रू नव्हे, प्लास्टीकची विल्हेवाट योग्यरित्या लावा, जागरूक नागरिक बना, प्लास्टीक रस्त्यावर फेकू नका, पाणी वाचवा, डिस्पोजेबल वापरा, जे बेरोजगार होणार त्यांना न्याय द्या, प्लास्टिक वापरा झाडे वाचवा, तुमच्या भांडणात माझा काय दोष? (५१ मायक्रॉन), आधी पर्याय द्या, मग बंदी घाला इ. घोषवाक्यांचे फलक मोर्चेकरी व्यापाºयांच्या हाती होते.

टॅग्स :BeedबीडPlastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडाagitationआंदोलन