शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:54 IST

सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. प्रीतम मुंडे यांनी दिले.

- अविनाश कदमआष्टी (बीड) : तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागिल १० ते १५ दिवसांपासून जोरदार कोसळधाराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. अद्याप ही आष्टी तालुक्याची पाठ सोडायला पाऊस तयार नाही पांढरी, सोलेवाडी, आष्टा महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिन खरडून पिके वाहून गेली आहेत. शेत जलमय झाले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नुकसानीची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी हताश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खा. मुंडे यांनी सांत्वन केले. 

तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून पांढरी, सोलेवाडी येथील नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी व चांगल्या प्रकारच्या जमिनी ही खरडून गेल्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संकटात सापडले आहेत.नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.पिके पाण्यात आहेत.दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी आहेत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची खा‌. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ दरम्यान पांढरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व‌ तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच नुकसानीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. मुंडे यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात मा.आ. भीमराव धोंडे, विजय गोल्हार, अजय धोंडे, सागर धस, अमोल तरटे, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे,दिलीप हंबर्डे, उपविभागीय अधिकारी  कुदळे साहेब, तहसिलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कृषी अधिकारी गोरख तरटे, युवराज वायबसे,रघुनाथ शिंदे, तात्या कदम , केशव बांगर,सरपंच राहुल काकडे,सुधिर पठाडे, जालिंदर वांढरे, बाळासाहेब नागरगोजे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची सांत्वन पर भेटआष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब वांढरे या शेतकऱ्यांने अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबांची खा. मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेऊन शेतक-यांनो हताश होऊ नका हे सरकार शेतकऱ्यांचे असून तुमच्या पाठीशी आहे. शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसPritam Mundeप्रीतम मुंडेagricultureशेती