शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:54 IST

सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. प्रीतम मुंडे यांनी दिले.

- अविनाश कदमआष्टी (बीड) : तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागिल १० ते १५ दिवसांपासून जोरदार कोसळधाराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. अद्याप ही आष्टी तालुक्याची पाठ सोडायला पाऊस तयार नाही पांढरी, सोलेवाडी, आष्टा महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिन खरडून पिके वाहून गेली आहेत. शेत जलमय झाले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नुकसानीची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी हताश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खा. मुंडे यांनी सांत्वन केले. 

तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून पांढरी, सोलेवाडी येथील नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी व चांगल्या प्रकारच्या जमिनी ही खरडून गेल्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संकटात सापडले आहेत.नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.पिके पाण्यात आहेत.दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी आहेत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची खा‌. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ दरम्यान पांढरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व‌ तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच नुकसानीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. मुंडे यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात मा.आ. भीमराव धोंडे, विजय गोल्हार, अजय धोंडे, सागर धस, अमोल तरटे, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे,दिलीप हंबर्डे, उपविभागीय अधिकारी  कुदळे साहेब, तहसिलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कृषी अधिकारी गोरख तरटे, युवराज वायबसे,रघुनाथ शिंदे, तात्या कदम , केशव बांगर,सरपंच राहुल काकडे,सुधिर पठाडे, जालिंदर वांढरे, बाळासाहेब नागरगोजे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची सांत्वन पर भेटआष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब वांढरे या शेतकऱ्यांने अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबांची खा. मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेऊन शेतक-यांनो हताश होऊ नका हे सरकार शेतकऱ्यांचे असून तुमच्या पाठीशी आहे. शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसPritam Mundeप्रीतम मुंडेagricultureशेती