शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने बारा किमीचा तरी रस्ता केला का? - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:52 IST

मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देगेवराईच्या कार्यक्रमात पवार समर्थकांच्या घोषणा :पालकमंत्री म्हणाल्या, ‘जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात’

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे, ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रु पयांचा विकास निधी या जिल्हयात आला, रस्ते, रेल्वे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे याठिकाणी झाल्याने हा जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी गेवराई येथे केले. दरम्यान, मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.राष्टÑीय महामार्गाच्या येडशी- औरंगाबाद टप्प्याचे लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे,आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे , जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, २०१४ मध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते विकास खाते आले आणि त्यांनी प्रत्येक जिल्हयात हजारो कोटी रु पयांचे रस्ते निर्माण केले. या रस्त्यामुळे मराठवाड्यात विकासाची नवी पहाट उगवली. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे याची सत्तेला जाण होती. म्हणून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळाला. माझा जिल्हा कोल्हापूर, सांगलीसारखा झाला पाहिजे, यासाठी आपण काम केले. रेल्वे, रस्ते, प्रशासकीय इमारती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी निधी आणला. जलयुक्त शिवार मधून पाण्याची टंचाई दूर केली. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या डोळ्यातील धुराचा त्रास कमी केला. संपूर्ण स्वच्छता योजनेतून शौचालय उभारून स्वच्छता आणि आरोग्य सुधारले असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस यांनीही भाषण केले. बीड, माजलगाव, गेवराई तालुक्यातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.साहेबांनी शब्द दिला अन् मी तो पाळलाआ. लक्ष्मण पवार यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे यांनी ‘आम्ही शब्द पाळणारे आहोत’ असे सांगितले. त्या म्हणाल्या, बाप्पासाहेब पवार यांना त्यांच्या मुलाला आमदार करण्याचा शब्द लोकनेते मुंडे साहेबांनी दिला होता. पण तो शब्द पंकजा मुंडेंनी पाळला आणि पहिले तिकीट जाहीर केले. माझ्या मनात कसलाही संकोच नाही. तुम्हीच मध्यंतरी कुणाला घरी बोलावले, सत्कार केले. मी मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मण पवार यांच्या मागणीवरून निधी दिला, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असेही त्या म्हणाल्या.बारा आमदार दिले, काम काय केले?पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच केला नाही. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषद आमदारकी त्यांनी वाटली, जिल्ह्यात बारा आमदार दिले पण या बारा आमदारांनी बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, हा सवाल आपण त्या नेतृत्वाला केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेत कधी प्रशासकीय इमारती दिल्या नाहीत. रस्ते, पाणी,वीज यासाठी झगडावे लागले. लाख, २ लाख देऊन बोळवण केली जायची.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस