शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'काही विघ्नसंतोषी...';'बंजारा-वंजारा एकच' वक्तव्यावरून वाद पेटताच धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:34 IST

‘काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून गैरसमज पसरवला’; धनंजय मुंडेंचा आपल्या वक्तव्यावर खुलासा

- संजय खाकरेपरळी: बीड येथे बंजारा समाजाच्या मोर्चात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर माजी कृषिमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी तातडीने आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘वंजारा आणि बंजारा जात, संस्कृती आणि बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत’ असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी (दि. १६) बीड शहरात बंजारा समाजाने एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषण करताना ‘वंजारा आणि बंजारा एक आहोत’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. १९९४ मध्ये तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनीही असेच विधान करून बंजारा समाजाचे २.५ टक्के आरक्षण हिरावून घेतल्याचा आरोप करत समाजाने धनंजय मुंडेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.

बीडमध्ये वाद पेटलेला असतानाच, धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि. १७) पहाटेच्या अतिवृष्टीमुळे परळी तालुक्यातील शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी वानटाकळी, बोधेगाव, मोहा, वंजारवाडी आणि गडदेवाडी येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. याच दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीड येथील विधानावर स्पष्टीकरण दिले.

मुंडे म्हणाले, “वंजारा आणि बंजारा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीही वेगळ्या आहेत. बीडमध्ये चांगला कार्यक्रम असताना काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरवला.” बंजारा समाजाचे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर पहिल्यापासून कायम प्रेम राहिले आहे. त्या प्रेमातूनच मी हे बोललो होतो. पण चुकीच्या घोषणा देणारे कोण आहेत, हे आता सोशल मीडियावर समोर येत आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनपाहणी दौऱ्यात मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. कापसासह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल.”

रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे,दरम्यान, परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामावरही मुंडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बीड-नगर रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे, तर परळी-बीड रेल्वेचे स्वप्न पुढील वर्षात पूर्ण होईल. यासाठी अजित पवार यांनी लक्ष घातले असून, पंकजा मुंडे यांनीही या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले आहेत,” असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांचेही कौतुक केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडreservationआरक्षण