शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

'काही विघ्नसंतोषी...';'बंजारा-वंजारा एकच' वक्तव्यावरून वाद पेटताच धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:34 IST

‘काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून गैरसमज पसरवला’; धनंजय मुंडेंचा आपल्या वक्तव्यावर खुलासा

- संजय खाकरेपरळी: बीड येथे बंजारा समाजाच्या मोर्चात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर माजी कृषिमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी तातडीने आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘वंजारा आणि बंजारा जात, संस्कृती आणि बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत’ असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी (दि. १६) बीड शहरात बंजारा समाजाने एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषण करताना ‘वंजारा आणि बंजारा एक आहोत’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. १९९४ मध्ये तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनीही असेच विधान करून बंजारा समाजाचे २.५ टक्के आरक्षण हिरावून घेतल्याचा आरोप करत समाजाने धनंजय मुंडेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.

बीडमध्ये वाद पेटलेला असतानाच, धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि. १७) पहाटेच्या अतिवृष्टीमुळे परळी तालुक्यातील शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी वानटाकळी, बोधेगाव, मोहा, वंजारवाडी आणि गडदेवाडी येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. याच दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीड येथील विधानावर स्पष्टीकरण दिले.

मुंडे म्हणाले, “वंजारा आणि बंजारा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीही वेगळ्या आहेत. बीडमध्ये चांगला कार्यक्रम असताना काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरवला.” बंजारा समाजाचे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर पहिल्यापासून कायम प्रेम राहिले आहे. त्या प्रेमातूनच मी हे बोललो होतो. पण चुकीच्या घोषणा देणारे कोण आहेत, हे आता सोशल मीडियावर समोर येत आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनपाहणी दौऱ्यात मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. कापसासह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल.”

रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे,दरम्यान, परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामावरही मुंडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बीड-नगर रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे, तर परळी-बीड रेल्वेचे स्वप्न पुढील वर्षात पूर्ण होईल. यासाठी अजित पवार यांनी लक्ष घातले असून, पंकजा मुंडे यांनीही या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले आहेत,” असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांचेही कौतुक केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडreservationआरक्षण