शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:40 IST

'हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.'

बीड: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीची राज्यभर चर्चा सुरू झाली. याच प्रकरणामुळे जिल्ह्यात जातीवादाचा मुद्दाही चांगलाच पेटला. यामुळेच बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या नेमप्लेटवरुन आडनाव काढण्यास सांगितले. आता याच मुद्द्यावरुन परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

“हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. ही प्रवृत्ती समाजातील बंधुभावाला धक्का देणारी आहे. जातीजातीत महापुरुष वाटून घेतले जाणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण सर्वांनी मिळून नाहीशी करून समाजात पुन्हा एकदा खरी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवार (दि.६) महाराष्ट्र आधार सेना, दैनिक महाराष्ट्र आरंभ आणि सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुंडे पुढे म्हणतात, “बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. आज आपण प्रत्येकाने आपआपलेच महामानव वाटून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का?”असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

“महामानवांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे. माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही. मला सांगायला लाज वाटते की, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल, तर ही सामाजिक समता आहे का? बीडमध्ये ही प्रथा पडली, याची खंत वाटते,” अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडPoliceपोलिस