शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला : भिक्खू ज्ञानरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

चांदापूर बौद्ध धम्म परिषदेचा शानदार समारोप अंबाजोगाई : चांदापूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्ध ...

चांदापूर बौद्ध धम्म परिषदेचा शानदार समारोप

अंबाजोगाई :

चांदापूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला भन्ते उपगुप्त महाथेरो (पूर्णा), भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शंकरराव जगतकर नगरी, चांदापूर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.

स्वागताध्यक्षपदी प्रा.प्रदीप रोडे हे होते.

या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव जगतकर तर यावेळी आ. संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी चंद्रशेखर वडमारे, भास्कर रोडे, डॉ. विनोद जगतकर, सरपंच बळीराम मिसाळ, उपसरपंच, अभियंता दत्तात्रय भिसे, प्रयागबाई मिसाळ, प्रा. दासू वाघमारे, परळीभूषण पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. माधव रोडे यांची उपस्थिती होती. संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले.

या प्रसंगी बोलताना आ.संजय दौंड यांनी चांदापूर येथील तक्षशिला बौद्ध धम्म प्रतिष्ठानला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगून हा परिसर विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करू असे सांगत धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी २५ हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी चांदापूर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगून धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले. भंते धम्मशील यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे, असे सांगितले. यावेळी भिक्खू ज्ञानरक्षित यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी त्रिपिटीकातून घेतला आहे. आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे. धम्म विचारांत जगाच्या कल्याणाचे सुख सामावले असल्याचे यावेळी धम्मरक्षित यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले.

स्वागताध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी चांदापूर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड. अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. चारित्र्यसंपन्न व नीतीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जगतकर यांनी केले. या धम्म परिषदेत १४ विविध महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येऊन ते पारित करण्यात आले.