शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

सत्ताधाऱ्यांना व्हिजन नसल्यानेच मराठवाड्याचा विकास खुंटला - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:37 AM

बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ...

बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर उतरणार असून, मराठवाड्याचा सर्वांगीण विकास अणि नागरी सुविधा या प्रमुख विषयांवर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक समीक्षा आणि संवाद यात्रेदरम्यान शनिवारी त्या बीड येथे आल्या होत्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर म्हणाल्या, घराणेशाहीचे चाललेले राजकारण, एमआयडीसीच्या जमिनीवर उद्योग नसल्याने रोजगाराची वाढती समस्या तसेच पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत कसलेही नियोजन नसल्याने नागरी सुविधांचा अभाव या प्रमुख विषयांवर वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोपही ठाकूर यांनी यावेळी केला. गेल्या २३ वर्षांत ओबीसींसाठी केवळ ५० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याचे सांगून ओबीसी महामंडळाला भरीव निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ३० व ३१ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. मुस्लिम आरक्षणाबाबत अंमलबजावणी करावी म्हणून वंचित बहुजन आघाडी आग्रही असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रवक्ते फारूक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, विष्णू देवकते, बबन वडमारे आदी उपस्थित होते.

-----

जनगणना वैधानिक बंधन

केंद्र शासनाने ओबीसी जनगणना करावी तसे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र आता त्याचे पालन होत नसून कायदेशीरपणे इंम्पिरियल डाटा जनगणनेतूनच उपलब्ध होऊ शकेल. जनगणना हे वैधानिक बंधन आहे. ओबीसीचे भले होण्यासाठी त्यांची जनगणना आवश्यक असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. काही पक्ष, नेते ओबीसींच्या हिताचा विचार न करता फसवणूक करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

------