शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:35 IST

परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी डागली तोफ : परळीत राष्ट्रवादीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.१ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय सुरू असलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील हालगे गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी मुंडे बोलत होते.२०१२ मध्ये शून्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज परळी विधानसभा मतदार संघाचा बालेकिल्ला झाला आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत आपण सर्व निवडणुका जिंकल्या. आता पक्ष नेतृत्वाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची वेळ आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात परिवर्तन करण्याची ताकद आहे. आपल्याला बीड जिल्ह्यातील सहाही जागा जिंकायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. बीडच्या मेळाव्यात सर्वाधिक संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन मुंडे यांनी या मेळाव्यात केले.वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नाव केंद्र शासनाच्या रेल्वे आणि पर्यटन विभागातून वगळून परळीचा आणि साक्षात वैद्यनाथाचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त करून एकवेळ विकास नाही झाला तरी चालेल, मात्र शहराचा आणि भगवंतांचा अपमान कदापिही सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. युवकांची मोठी शक्ती मेळाव्यात दिसेल, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांचेही भाषण झाले.कार्यक्रमास बाळासाहेब आजबे, आप्पा राख, बाळासाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण, कृ.उ.बा. सभापती गोविंदराव फड, रणजित लोमटे, चंदूलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, व पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी, सूत्रसंचालन गोविंद केंद्रे तर आभार प्रदर्शन प्रा. मधुकर आघाव यांनी केले. कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभारणार४केंद्र आणि राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. महागाई वाढली, शेत मालाचे भाव पडले, अच्छे दिनच्या केवळ थापा मारणारे हे थापाडे सरकार असून, ते आपल्याला घालवायचे आहे. त्यासाठीच निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्यास संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस