शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:46 IST

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देमाहिती देण्यास टाळाटाळ : पावणेपाच लाख शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित; शेतकऱ्यांत संताप

बीड : खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांच्या जखमेवर विमा कंपनी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकºयांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकºयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीकडे विचारणा करण्यासाठी जातात. मात्र, येथील अधिकारी, विमा प्रतिनिधी शेतकºयांना अरेरावी करण्यासह त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकºयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकºयांच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तालुक्याच्या ठिकाणी निरसन होत नसल्याने शेतकरी बीडच्या मुख्य शाखेत येतात, येथील अधिकारी आमच्याकडे काही नाही, तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच विम्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकºयांनी दिला आहे.सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षाजिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकºयांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे.अद्यापही ३ लाख ४४ हजार ९४० शेतकºयांना विमा मिळालेला नाही. कंपनीला विचारणा केल्यास येईल-येईल, असे उत्तरे देतात, तर कृषी विभागाकडून आम्हाला याची काही माहिती नाही, असे सांगून हात झटकले जात आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा