शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:46 IST

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देमाहिती देण्यास टाळाटाळ : पावणेपाच लाख शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित; शेतकऱ्यांत संताप

बीड : खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांच्या जखमेवर विमा कंपनी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकºयांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकºयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीकडे विचारणा करण्यासाठी जातात. मात्र, येथील अधिकारी, विमा प्रतिनिधी शेतकºयांना अरेरावी करण्यासह त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकºयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकºयांच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तालुक्याच्या ठिकाणी निरसन होत नसल्याने शेतकरी बीडच्या मुख्य शाखेत येतात, येथील अधिकारी आमच्याकडे काही नाही, तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच विम्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकºयांनी दिला आहे.सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षाजिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकºयांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे.अद्यापही ३ लाख ४४ हजार ९४० शेतकºयांना विमा मिळालेला नाही. कंपनीला विचारणा केल्यास येईल-येईल, असे उत्तरे देतात, तर कृषी विभागाकडून आम्हाला याची काही माहिती नाही, असे सांगून हात झटकले जात आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा