शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:46 IST

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देमाहिती देण्यास टाळाटाळ : पावणेपाच लाख शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित; शेतकऱ्यांत संताप

बीड : खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांच्या जखमेवर विमा कंपनी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकºयांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकºयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीकडे विचारणा करण्यासाठी जातात. मात्र, येथील अधिकारी, विमा प्रतिनिधी शेतकºयांना अरेरावी करण्यासह त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकºयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकºयांच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तालुक्याच्या ठिकाणी निरसन होत नसल्याने शेतकरी बीडच्या मुख्य शाखेत येतात, येथील अधिकारी आमच्याकडे काही नाही, तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच विम्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकºयांनी दिला आहे.सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षाजिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकºयांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे.अद्यापही ३ लाख ४४ हजार ९४० शेतकºयांना विमा मिळालेला नाही. कंपनीला विचारणा केल्यास येईल-येईल, असे उत्तरे देतात, तर कृषी विभागाकडून आम्हाला याची काही माहिती नाही, असे सांगून हात झटकले जात आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा