शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच ‘त्या’ मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:10 AM

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : प्रकरण दडपण्यासाठी मध्यरात्री १ वाजता केले शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे प्रकरण दडपविण्यासाठी नातेवाईकांच्या इच्छेविरोधात दबावतंत्र वापरुन मध्यरात्री १ वाजताच मीरा यांचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांच्या सर्व हालचालीवरून या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथील रहिवासी असलेले रामेश्वर भगवानअप्पा एखंडे हे गेल्या २५ वर्षांपासून माजलगाव येथे स्थायिक आहेत. हलाखीची परिस्थिती असल्याने पानटपरीच्या व्यवसायातून ते उपजीविका भागवतात. त्यांचे २० वर्षांपूर्वी परळी येथील मीरा यांच्याशी विवाह झाला. आतापर्यंत त्यांना ७ मुली झाल्या. कमी शिक्षण व अज्ञान असल्याने त्यांना वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा होता. आजपर्यंत मीरा यांची जवळपास ७ वेळा प्रसुती झाली. विशेष म्हणजे एकही सीझर झाले नाही. त्या आठव्यांदा गर्भवती राहिल्या. प्रसुतीसाठी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता तुम्हाला वेळ आहे, तुम्ही थांबा...असे सांगितले. त्यानुसार मीरा या आपल्या नातेवाईकासह तेथेच थांबल्या. याचदरम्यान त्यांना कळा सुरू झाल्या. डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल सहा तास याकडे कोणीच लक्ष दिले नाही. याचवेळी त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि मीरा यांना प्रसुतीगृहात घेतले. अतिरक्तस्त्राव झाल्याने सदरील बाळ गर्भातच दगावले. त्यानंतर मीरा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांनी वेळेवर तपासणी आणि उपचार केले नाहीत, म्हणूनच मृत्यू झाल्याचा आरोप मीरा यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ्रसदर बाळाचे पावणेचार किलो वजन असल्यामुळे सिझेरियन आवश्यक होते. मात्र, डॉक्टरांनी निर्णय घेण्यात वेळ घातला आणि सिझरेयिन करण्याचे टाळले. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेयासाठी आवश्यक सामुग्री नसल्यामुळे डॉक्टरांनी टाळल्याचे समोर येत आहे.डॉक्टरांकडून नातेवाईकांची दिशाभूल४प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या मीरा यांची प्रसुतीची आठवी वेळ असल्याने त्यांच्या गर्भशयाची पिशवी कमजोर झाल्याने असा प्रकार झाला आहे. ‘एवढे लेकरं होवू द्यायची काय गरज’ असे सांगून सिझेरियन केले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे म्हणत डॉक्टरांनी नातेवाईकांची दिशाभूल केल्याचे सांगण्यात येते.आईला पाहूनमुलींचा हंबरडा४सकाळी आपली आई किती चांगली होती. आम्हा सर्वांना बोलून गेली. रात्री आपल्या आईचा मृतदेहच पाहण्याची वेळ या अभागी सात बहिणींना आल्याने त्यांनी आई...आई...म्हणत हंबरडा फोडला. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दुर्दैवी घटनेने मन हेलावून गेले होते.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल