शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

संततधार पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST

आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक ...

आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक करपू लागले होते. आता काढणीला सुरुवात करायची तोच मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकाच्या शेंगा कुजून गळू लागल्या आहेत.

तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसाने मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. काही भागात मूग, उडीदाच्या शेंगा पावसाअभावी थोड्या फार प्रमाणात आल्याचे चित्र आहे. परंतु, सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागली आहे. पावसाच्या पाण्याने शेंगा सडत असल्याचे चित्र आहे. कापसावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या पावसाने झाडांची खालील पाने लालसर, पिवळी पडत असून, गळत आहेत. पावसाने दडी दिल्यानंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळिराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने काढणीला थोड्या फार प्रमाणात आलेली पिकेदेखील हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

चौकट -

‘थांब रे पावसा’ म्हणण्याची वेळ

आष्टी तालुक्यातील उडीद, मूग पिकांना अक्षरशः मोड फुटल्याचे दिसून येते. उडीद पीक यावर्षी थोड्या फार प्रमाणात असून, सततच्या संततधार पावसाने काढणी करता येत नाही; मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यांसमोर पूर्णपणे नुकसान होईल. ‘थांब रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सरसकट पंचनामे करून भरपाई द्या

अगोदरच मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट झाली आहे. फळधारणेत पावसाअभावी व काढणीत पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक पाहणी करून मूग, उडीद, आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी.

- रघुनाथ शिंदे, शेतकरी, आष्टी.

220821\img-20210822-wa0553_14.jpg