शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

संततधार पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST

आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक ...

आष्टी : तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत ओढ दिल्याने उडीदाचे पीक करपू लागले होते. आता काढणीला सुरुवात करायची तोच मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकाच्या शेंगा कुजून गळू लागल्या आहेत.

तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसाने मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. काही भागात मूग, उडीदाच्या शेंगा पावसाअभावी थोड्या फार प्रमाणात आल्याचे चित्र आहे. परंतु, सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागली आहे. पावसाच्या पाण्याने शेंगा सडत असल्याचे चित्र आहे. कापसावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या पावसाने झाडांची खालील पाने लालसर, पिवळी पडत असून, गळत आहेत. पावसाने दडी दिल्यानंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळिराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने काढणीला थोड्या फार प्रमाणात आलेली पिकेदेखील हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

चौकट -

‘थांब रे पावसा’ म्हणण्याची वेळ

आष्टी तालुक्यातील उडीद, मूग पिकांना अक्षरशः मोड फुटल्याचे दिसून येते. उडीद पीक यावर्षी थोड्या फार प्रमाणात असून, सततच्या संततधार पावसाने काढणी करता येत नाही; मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यांसमोर पूर्णपणे नुकसान होईल. ‘थांब रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सरसकट पंचनामे करून भरपाई द्या

अगोदरच मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट झाली आहे. फळधारणेत पावसाअभावी व काढणीत पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक पाहणी करून मूग, उडीद, आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी.

- रघुनाथ शिंदे, शेतकरी, आष्टी.

220821\img-20210822-wa0553_14.jpg