शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:35 IST

माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमागील हंगामातील थकबाकी अदा करा : शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर इंडस्ट्रीज आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांकडून २६५ जातीचा ऊस नेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. मात्र त्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. २६५ जातीचा ८ लाख टन ऊस सध्या उभा आहे. २६५ जातीचा ऊस नेण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गाळपासाठी कारखाने गेटकेन ऊस आणत आहेत. परिणामी कार्यक्षेत्रातील २६५ जातीचा ऊस वेळेत गाळपासाठी गेला नाही तर वाळण्याची शक्यता आहे. गेटकेन ऊस बंद करुन तिन्ही कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी प्रशासनाने सूचना करावी अशी मागणी थावरे यांनी केली आहे.२६५ जातीचा ऊस गाळपास न्यावा, शेतकºयांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील परभणी चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.२६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ२६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा म्हणून शेतकºयांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार करुन औरंगाबाद येथे साखर सहसंचालकांना घेराव घातला होता.त्यानंतर तिन्ही कारखान्यांनी हा ऊस नेण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत.मागील वर्षी गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकºयांचे माजलगाव कारखान्याकडे प्रती टन ८००, छत्रपती कारखान्याकडे ७०० रुपये तसेच जयमहेशकडे ४५० रुपयेप्रमाणे उसाचे बील थकलेले आहे.प्रशासनाने सूचना केल्यानंतरही कारखान्यांनी कार्यवाही केली नसल्याचे थावरे म्हणाले. किमान दुष्काळाचे भान राखत कारखान्यांनी या रकमेचे वाटप करुन पालनकर्ते असल्याचे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न घेण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली; हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. शेतातील उसाचे आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन