शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:35 IST

माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमागील हंगामातील थकबाकी अदा करा : शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर इंडस्ट्रीज आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांकडून २६५ जातीचा ऊस नेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. मात्र त्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. २६५ जातीचा ८ लाख टन ऊस सध्या उभा आहे. २६५ जातीचा ऊस नेण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गाळपासाठी कारखाने गेटकेन ऊस आणत आहेत. परिणामी कार्यक्षेत्रातील २६५ जातीचा ऊस वेळेत गाळपासाठी गेला नाही तर वाळण्याची शक्यता आहे. गेटकेन ऊस बंद करुन तिन्ही कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी प्रशासनाने सूचना करावी अशी मागणी थावरे यांनी केली आहे.२६५ जातीचा ऊस गाळपास न्यावा, शेतकºयांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील परभणी चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.२६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ२६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा म्हणून शेतकºयांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार करुन औरंगाबाद येथे साखर सहसंचालकांना घेराव घातला होता.त्यानंतर तिन्ही कारखान्यांनी हा ऊस नेण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत.मागील वर्षी गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकºयांचे माजलगाव कारखान्याकडे प्रती टन ८००, छत्रपती कारखान्याकडे ७०० रुपये तसेच जयमहेशकडे ४५० रुपयेप्रमाणे उसाचे बील थकलेले आहे.प्रशासनाने सूचना केल्यानंतरही कारखान्यांनी कार्यवाही केली नसल्याचे थावरे म्हणाले. किमान दुष्काळाचे भान राखत कारखान्यांनी या रकमेचे वाटप करुन पालनकर्ते असल्याचे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न घेण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली; हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. शेतातील उसाचे आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन