शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:35 IST

माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमागील हंगामातील थकबाकी अदा करा : शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर इंडस्ट्रीज आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांकडून २६५ जातीचा ऊस नेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. मात्र त्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. २६५ जातीचा ८ लाख टन ऊस सध्या उभा आहे. २६५ जातीचा ऊस नेण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गाळपासाठी कारखाने गेटकेन ऊस आणत आहेत. परिणामी कार्यक्षेत्रातील २६५ जातीचा ऊस वेळेत गाळपासाठी गेला नाही तर वाळण्याची शक्यता आहे. गेटकेन ऊस बंद करुन तिन्ही कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी प्रशासनाने सूचना करावी अशी मागणी थावरे यांनी केली आहे.२६५ जातीचा ऊस गाळपास न्यावा, शेतकºयांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील परभणी चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.२६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ२६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा म्हणून शेतकºयांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार करुन औरंगाबाद येथे साखर सहसंचालकांना घेराव घातला होता.त्यानंतर तिन्ही कारखान्यांनी हा ऊस नेण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत.मागील वर्षी गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकºयांचे माजलगाव कारखान्याकडे प्रती टन ८००, छत्रपती कारखान्याकडे ७०० रुपये तसेच जयमहेशकडे ४५० रुपयेप्रमाणे उसाचे बील थकलेले आहे.प्रशासनाने सूचना केल्यानंतरही कारखान्यांनी कार्यवाही केली नसल्याचे थावरे म्हणाले. किमान दुष्काळाचे भान राखत कारखान्यांनी या रकमेचे वाटप करुन पालनकर्ते असल्याचे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न घेण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली; हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. शेतातील उसाचे आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन