शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

CoronaVirus: लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला; अन्न-निवाऱ्यासाठी मजूर कुंटूंबाचा इंदापूर ते मानवत पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 4:15 PM

जागो जागी मदत झाली, कधी पाण्यावर काढला दिवस 

ठळक मुद्देधारूर येथे अन्नाची झाली सोयआणखी तीन ते चार दिवस लागणार घरी पोहचण्यास

- अनिल महाजन

धारूर :  इंदापूर येथे इमातीच्या बांधकामावर मजूरी करण्यासाठी गेलेल मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे  हे दोन मुले, पत्नीसह पायी घराकडे निघाले आहेत. कोरोना मुळे काम बंद झाल्याने मुळ ठेकेदार निघून गेला, यामुळे राहण्याखाण्याची चिंता निर्माण झाल्याने पंधरा दिवसांपासून हा खडतर प्रवास कुटुंब आणि साडूसह करत आहेत. या दरम्यानचे त्यांचे अनूभव ऐकताना अंगावर शहारे येतात. कधी उपाशीपोटी पाण्याचा घोट पिऊन तर कधी कोणी दिलीच मदत तर ती घेऊन मोठ्या आशेने हे कुटुंब घराकडे निघाले आहे.

कोरोना चे प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व अघाड्यावर उपाययोजना कठोरपणे करत आहे. लाॕकडाऊनमुळे हातावर पोट असणारा मजूर वर्ग माञ त्रस्त होऊन गेला आहे. उदरनिर्वाहसाठी स्थंलातरीत झालेले मजूर तर अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. अशीच परिस्थिती मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे यांच्यावर आली आहे.  ते पत्नी व दोन लहान मुला सह इंदापूर जि पुणे येथे बांधकामावर चांगली मजूरी मिळते म्हणूण एक वर्षापूर्वी गेले होते. माञ कोरोनामुळे  काम बंद झाले अन ठेकेदार निघून गेला. यामुळे कुंटूंबाचे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. याच काळात कामाचे शोधात त्यांचा साडू तिथे आला. 

सर्व कुंटूंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी मानवतला जायचे ठरवले. मात्र हातात पैसे नाहीत अन प्रवासाला वाहन नाही यामुळे हे पायीच घराकडे निघाले. सहपायपीट करत दोनशे पेक्षा जास्त किंमीचा प्रवास करत डोक्यावर संसार घेऊन पंधराव्या सोळव्या दिवशी धारूरला पोहचले. मानवतला पोहचायला आणखी तिन ते चार दिवस लागणार आहेत. रस्त्यात जिथे निवारा मिळेल तिथे मुक्काम केला रस्त्यात ब-याच ठिकाणी लोकांनी खायला दिले माञ काही राञी पाणी पिऊन झोपावे लागले. कोरोनामुळे फक्त आपल्या मुळ गावात पोहचायचे एवढेच ध्येय समोर हे कुंटूब सर्व अडचणीवर मात करून प्रवास करत आहे. दरम्यान, हे कुंटूंब धारूर येथे आले असता राधेश्याम रहेवाल यांनी त्यांना जेवण देऊन पुढे पाठवले. येथे त्यांच्या प्रवासाची कहाणी व अनूभव ऐकतान माञ आंगावर शहारे उभे राहत होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड