शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

coronavirus : पाडवा आला तरी सालगडी ठरेनात; कोरोनाच्या भीतीने बाहेर जिल्ह्यातील मजुरांना पाठवले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:10 IST

गावागावात अनेक बाहेर जिल्ह्यातील लोक सालगडी म्हणून राहण्यासाठी आले होते

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : गुढीपाडवा येण्याच्या एक दिन महिन्या अगोदर शेतकरी आपल्याला कोणता सालगडी ठेवायचा याची चाचपणी करत असतो परंतु यावर्षी कोरोना च्या भीतीने शेतकऱ्यांनी अध्याप सालगडी ठरवले नसून परजिल्ह्यातून कामासाठी आलेल्या लोकांना शेतकऱ्यांनी परत पाठवून एक महिन्याने येण्याचा सल्ला देखील दिला आहे.

गुढीपाडव्याला शेतकरी सर्व नवे-जुने व्यवहार करत असतो. यात प्रामुख्याने आपल्याला किती गडी लागतात हे पाहुन व 2-3 महिण्यांपासुन दुसऱ्याचा चांगला गडी आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. एक दुसऱ्याचा गडी लावण्यात अनेक वेळा गावात भांडणे देखील होतात.या वर्षी बुधवारी गुडी पाडवा असतांना 75 टक्के शेतकऱ्यांचे अद्याप सालगडी देखील ठरलेले नाहीत. मागील 10-12 दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने अनेक शेतकरी आपल्या गावाकडे फिरकलेच नाही तर गावातच राहणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने घराबाहेर निघणे बंद केले व अनेकांनी भेटीगाठी देखील टाळल्याने यावर्षी सालगडी ठरविण्यात उशीर झाला आहे.   

माजलगाव तालुक्यात परभणी , सेलू , मानवत , जालना , आष्टी  ,परतूर , मंठा आदि या भागातील अनेक लोक आपल्याला मोलमजुरी मिळावी म्हणून आपल्यामुळे मुलाबाळांसह याठिकाणी येतात. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण इकडे फिरकलेच नाहीत तर अनेक जण आले असतानादेखील शेतकऱ्यांनी त्यांना  कोरोना संपल्‍यानंतर आपण यावे असा सल्ला देऊन त्यांना परत पाठवले.

शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार ?अनेक बाहेरगावी राहणारे व आपल्याकडे शेतात काम करण्यासाठी बारदाना नसलेले अनेक शेतकरी पाडव्याच्या दरम्यान आपली शेती ठोक्याने किंवा बटईने देत असतात.परंतु कोरोनाच्या भितीने अनेक शेतकऱ्यांची बटाईदाराशी किंवा ठोक्याने जमीन घेणारांची गाठभेटच होऊ शकली नाही. पाडव्याच्या मुहूर्तावर ठोक्याने किंवा बटईने घेणारे लोक शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. परंतु यावर्षी सालगडी  व जमीन ठोक्याने किंवा बटईने देण्यास उशीर झाल्याने शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार आहे .

गावागावात अनेक बाहेर जिल्ह्यातील लोक सालगडी म्हणून राहण्यासाठी आले होते परंतु कोणाच्या भीतीमुळे बाहेर जिल्ह्यातील लोकांना सालगडी म्हणून अद्याप कोणीच ठरवलेले नसल्याने व बटाईने जमीन दयायला उशीर झाल्याने यावर्षी शेत कामाला उशिरच होण्याची शक्यता आहे.--- राजेंद्र भंडारी , शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडFarmerशेतकरी