परळी वैजनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर परळीत काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
मागील ७ वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने देशाच्या जनतेचा विश्वास घात केला. सर्वच क्षेत्रांत महागाईत वाढ केली. पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज, दळणवळण, खाद्यतेल, दाळ, तांदूळ, जीवनावश्यक वस्तू किमती भरमसाट भाववाढ केली. निवडणुकीत दिलेली आश्वासन एकही पूर्ण केलेले नाही. ६ महिने झाले, ३ काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मोदी सरकार शेतकरी नेतृत्वासोबत चर्चा करत नाहीत. सात वर्ष पूर्ण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे मोंढा मैदान परळी येथे काँग्रेस नेते वसंत मुंडे, डॉ सुरेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. अनिल मुंडे, गणपत सौंदळे सर, गणपत आप्पा कोरे, प्रकाश देशमुख, विश्वनाथ गायकवाड, सय्यद अल्ताफ, अशोक कांबळे, धर्मराज खोसे, प्रा.नितीन हत्ती, अंबिरे लहुदास तांदळे, ॲड. संजय रोडे, शेख सिकंदर, शेख जावेद, शेख सी. एम., अजीम कुरेशी, समीर शेख, सय्यद जाफर, शेख सिराज यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
310521\31_2_bed_15_31052021_14.jpeg
===Caption===
कॉंग्रेस आंदोलनात सहभागी झालेले पदाधिकारी कार्यकर्ते