शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

जिल्हाधिकाऱ्यांचा लाॅकडाऊनचा निर्णय योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

आष्टी: राज्यात सध्या २७ लक्ष ५३ हजार रुग्ण कोरोना बाधित असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या ...

आष्टी: राज्यात सध्या २७ लक्ष ५३ हजार रुग्ण कोरोना बाधित असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी

रुग्ण संख्या वाढीचा दर पाहून दहा दिवसांसाठी केलेले लाॅकडाऊन योग्यच आहे. विरोधासाठी विरोध करणे चुकीचे असल्याचे माजी आ.भिमसेन धोंडे यांनी शुक्रवारी आष्टी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

बीड जिल्ह्यात आजपर्यंत २३ हजार ९८ कोरोना रूग्ण आढळून आले यामध्ये ६१० जणांचा मृत्यू झाले असून २ हजार ४२३ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. आष्टीत २ हजार २४२ बाधित तर ४४ मृत्यू, शिरूर ८०० बाधित, पाटोदा ७३५ बाधित २६ मृत्यू अशी रूग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांसाठी लाॅकडाॅऊन जाहीर केला असून या निर्णयाला काही कार्यकर्ते दोन दिवसांपासून विरोध करत असून ते जिल्हाधिकाऱ्यांना दोष देत आहेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मते जर याचप्रमाणे आकडे वाढले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करावे व सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे असे आवाहन धोंडे यांनी केले.

व्यापाऱ्यांनी कोरोनाला गांभीर्याने घ्यावे

आष्टी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेला लाॅकडाऊन न पाळण्याचा पवित्रा घेतला होता. गेल्या वर्षभरात छोट्या- मोठ्या व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम झाला हे बरोबर आहे.परंतु या महामारीमुळे शहरातील काही व्यापाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. धंदा आज ना उद्या होणार असून गेलेला जीव परत येणार नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंब उघड्यावर येते, म्हणून कोरोनाला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन माजी आ. भीमसेन धोंडे यांनी व्यापारी बांधवांना केले आहे.