शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जिल्हाधिकाऱ्यांचा लाॅकडाऊनचा निर्णय योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

आष्टी: राज्यात सध्या २७ लक्ष ५३ हजार रुग्ण कोरोना बाधित असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या ...

आष्टी: राज्यात सध्या २७ लक्ष ५३ हजार रुग्ण कोरोना बाधित असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी

रुग्ण संख्या वाढीचा दर पाहून दहा दिवसांसाठी केलेले लाॅकडाऊन योग्यच आहे. विरोधासाठी विरोध करणे चुकीचे असल्याचे माजी आ.भिमसेन धोंडे यांनी शुक्रवारी आष्टी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

बीड जिल्ह्यात आजपर्यंत २३ हजार ९८ कोरोना रूग्ण आढळून आले यामध्ये ६१० जणांचा मृत्यू झाले असून २ हजार ४२३ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. आष्टीत २ हजार २४२ बाधित तर ४४ मृत्यू, शिरूर ८०० बाधित, पाटोदा ७३५ बाधित २६ मृत्यू अशी रूग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांसाठी लाॅकडाॅऊन जाहीर केला असून या निर्णयाला काही कार्यकर्ते दोन दिवसांपासून विरोध करत असून ते जिल्हाधिकाऱ्यांना दोष देत आहेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मते जर याचप्रमाणे आकडे वाढले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करावे व सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे असे आवाहन धोंडे यांनी केले.

व्यापाऱ्यांनी कोरोनाला गांभीर्याने घ्यावे

आष्टी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेला लाॅकडाऊन न पाळण्याचा पवित्रा घेतला होता. गेल्या वर्षभरात छोट्या- मोठ्या व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम झाला हे बरोबर आहे.परंतु या महामारीमुळे शहरातील काही व्यापाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. धंदा आज ना उद्या होणार असून गेलेला जीव परत येणार नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंब उघड्यावर येते, म्हणून कोरोनाला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन माजी आ. भीमसेन धोंडे यांनी व्यापारी बांधवांना केले आहे.