शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; ८० रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे ...

बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. तर, कोरोनाच्या काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले असून, या काळात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात यश आले, तर काही प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

जिल्ह्यातील दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता ग्रामीण भागात शासनाकडून आठवी ते बारावीच्या वर्गाची शाळा सुरू केली आहे. यावेळी मुलींची पटसंख्या कमी झाल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले आहे. दरम्यान, या काळात ज्यांचे बालविवाह रोखले त्या मुलींना शाळेत पाठवले जात नसल्याचे समोर आले आहे. तर, या तीन महिन्यांच्या काळात जिल्हाभरात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच त्या पालकांचे समुपदेशन करून त्या मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व देखील यावेळी त्यांना पटवून देण्यात आले असून, विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी याचा परिणाम सकारात्मक झाला, तर काही प्रकरणांत परगावी पाठवून विवाह केल्याचे समोर आल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंतच्या शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेर शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची संख्या घटली?

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या दहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थिनींची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेत कारणे शोधणे गरजेचे आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला, ग्रामीण भागातही हेच चित्र आहे. परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करत होते. ग्रामीण भागात व ऊसतोड कामगारांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आहे.

एकूण विद्यार्थी उपस्थिती : २,६५२

किती शाळा सुरू : ८०

किती अद्याप बंद : ६७२

कोरोना काळात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच त्या गावात जाऊन आम्ही समुपदेशन करून अनेक बालविवाह रोखले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांत आर्थिक विवंचना व पालकांची बेरोजगारी हेच कारण असल्याचे समोर आले आहे. सर्वांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.

तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य, बीड