दिवसातून दोन-तीन वेळा विद्युत तार तुटूनही गांभीर्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:36+5:302021-08-01T04:30:36+5:30
सिरसाळा : सिरसाळा ही बाजारपेठ खूप मोठी आहे तसेच पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव आहे. याच ...

दिवसातून दोन-तीन वेळा विद्युत तार तुटूनही गांभीर्य नाही
सिरसाळा : सिरसाळा ही बाजारपेठ खूप मोठी आहे तसेच पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव आहे. याच गावातील मुख्य बाजारपेठेतील विद्युत खांबावरील विद्युत तार दिवसातून एक ते दोन वेळेस तुटून खाली पडते. सुदैवाने आतापर्यंत तरी कोणत्याच प्रकारची जीवित हानी झालेली नाही, मात्र भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
मुख्य बाजारपेठेतील विद्युत खांबावरील विद्युत तार ही पूर्णपणे खराब झालेली असून, महावितरण खात्यातील वरिष्ठ अधिकारी खराब झालेली विद्युत तार बदलून टाकण्याऐवजी वेळकाढूपणा करत आहेत. विद्युत तार तुटून बाजारपेठेतील विद्युत पुरवठा हा दिवसभर पूर्णपणे ठप्प होतो. येथील व्यापारी, उद्योजकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील व्यापारीवर्ग विद्युत खांबाच्या खालून जाताना दहशतीखाली वावरत आहेत. मुख्य बाजारपेठेतील विद्युत तार लवकरात लवकर बदलण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
300721\162030_2_bed_16_30072021_14.jpg
वीज तार सिरसाळा