शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:40 IST

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही

ठळक मुद्देआठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे झाली चोरीयोगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने

- अविनाश मुडेगांवकर 

 अंबाजोगाई - ‘चोरी केली की देव पाप देतो’ ही प्रचलित असलेली म्हण मात्र अंबाजोगाईकरांसाठी खोटीच ठरली. जिथे देवच सुरक्षित राहिला नाही. तिथे माणसांचं काय? असा प्रश्न श्री योेगेश्वरी देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी, यातील निर्दोष सुटलेले आरोपी यावरून निर्माण झाला आहे. 

 आठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे चोरट्यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले. दिवेआगार व अंबाजोगाई येथील झालेल्या या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे काहूर माजले होते. चोरीचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डी. वाय मंडलिक यांनी स्वत:कडे घेतला होता. दागिने चोरणारे चोर पकडून आणावेत या मागणीसाठी अंबाजोगाईत बंद, मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी भाविकांनी रोष व्यक्त केला होता. दागिन्यांविना देवी पाहणे भाविकांना न रुचल्याने चोरी गेलेल्या दागिन्यांपेक्षा तिप्पट दागिने भक्तांनी देवीला अर्पण केले. भाविकांची सोनेरी श्रद्धा देवीला भरभरून देऊन गेली. कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही  चोरांचा तपास लावा, ही मागणी पुढे करीत देवीच्या दागिन्यांसाठी स्वत: हातात परडी घेऊन मदत फेरी अंबाजोगाई शहरातून काढली होती. एक सच्चा भक्त म्हणून मुंडेंनी तीन लक्ष रुपये परडीत जमा केले व उर्वरित रक्कम स्वत:ची घालून देवीला दागिने अर्पण केले.  देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी व केज विधानसभेची पोटनिवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याने दागिन्यांच्या चोरीला राजकीय भांडवल म्हणून त्यावेळीच्या निवडणुकीत पाहिले गेले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. तत्कालिन मंत्री सुरेश धस, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ देवीला दागिने अर्पण केले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा तपास हा कळीचा मुद्दा बनला होता. अंबाजोगाई व दिवेआगार येथील झालेली चोरी , दोन्ही चोरीतील आरोपी  एकच असावेत असा कयास पोलिस प्रशासनाने बांधला व सलग दोन महिले विविध ठिकाणच्या आरोपींना चौकशीसाठी बोलावून धाडसत्र सुरूच राहिले. 

प्रशासनाचा दट्ट्या पोलिसांवर राहिल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशा अनेक घटना या कालवाधीत घडल्या. मात्र खरे चोर कोण? हा प्रश्न अजूनही निर्दोष सुटलेल्या आरोपींमुळे गुलदस्त्यातच राहिला आहे.  दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील पोलिसांनी पकडलेले आरोपी हे खरे आरोपी नाहीत याबाबत लोकमतने आवाज उठविला होता. अन् ती शंका न्यायालयाच्या निकालानंतर खरी ठरली. तब्बल एक वर्षे पोलिस तपास झाला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांना चोरांना शिक्षांना व्हावी व दागिने परत मिळावेत अशी अपेक्षा बाळगून होते. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. चोरीची घटना होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरीही पोलिस प्रशासनाला आजही आठ वर्षा नंतर या बाबतीत यश आले नाही. ही रुखरुख भाविकांच्या मनाला कायम बोचरी ठरणारी आहे.

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी