शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:40 IST

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही

ठळक मुद्देआठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे झाली चोरीयोगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने

- अविनाश मुडेगांवकर 

 अंबाजोगाई - ‘चोरी केली की देव पाप देतो’ ही प्रचलित असलेली म्हण मात्र अंबाजोगाईकरांसाठी खोटीच ठरली. जिथे देवच सुरक्षित राहिला नाही. तिथे माणसांचं काय? असा प्रश्न श्री योेगेश्वरी देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी, यातील निर्दोष सुटलेले आरोपी यावरून निर्माण झाला आहे. 

 आठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे चोरट्यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले. दिवेआगार व अंबाजोगाई येथील झालेल्या या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे काहूर माजले होते. चोरीचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डी. वाय मंडलिक यांनी स्वत:कडे घेतला होता. दागिने चोरणारे चोर पकडून आणावेत या मागणीसाठी अंबाजोगाईत बंद, मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी भाविकांनी रोष व्यक्त केला होता. दागिन्यांविना देवी पाहणे भाविकांना न रुचल्याने चोरी गेलेल्या दागिन्यांपेक्षा तिप्पट दागिने भक्तांनी देवीला अर्पण केले. भाविकांची सोनेरी श्रद्धा देवीला भरभरून देऊन गेली. कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही  चोरांचा तपास लावा, ही मागणी पुढे करीत देवीच्या दागिन्यांसाठी स्वत: हातात परडी घेऊन मदत फेरी अंबाजोगाई शहरातून काढली होती. एक सच्चा भक्त म्हणून मुंडेंनी तीन लक्ष रुपये परडीत जमा केले व उर्वरित रक्कम स्वत:ची घालून देवीला दागिने अर्पण केले.  देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी व केज विधानसभेची पोटनिवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याने दागिन्यांच्या चोरीला राजकीय भांडवल म्हणून त्यावेळीच्या निवडणुकीत पाहिले गेले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. तत्कालिन मंत्री सुरेश धस, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ देवीला दागिने अर्पण केले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा तपास हा कळीचा मुद्दा बनला होता. अंबाजोगाई व दिवेआगार येथील झालेली चोरी , दोन्ही चोरीतील आरोपी  एकच असावेत असा कयास पोलिस प्रशासनाने बांधला व सलग दोन महिले विविध ठिकाणच्या आरोपींना चौकशीसाठी बोलावून धाडसत्र सुरूच राहिले. 

प्रशासनाचा दट्ट्या पोलिसांवर राहिल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशा अनेक घटना या कालवाधीत घडल्या. मात्र खरे चोर कोण? हा प्रश्न अजूनही निर्दोष सुटलेल्या आरोपींमुळे गुलदस्त्यातच राहिला आहे.  दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील पोलिसांनी पकडलेले आरोपी हे खरे आरोपी नाहीत याबाबत लोकमतने आवाज उठविला होता. अन् ती शंका न्यायालयाच्या निकालानंतर खरी ठरली. तब्बल एक वर्षे पोलिस तपास झाला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांना चोरांना शिक्षांना व्हावी व दागिने परत मिळावेत अशी अपेक्षा बाळगून होते. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. चोरीची घटना होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरीही पोलिस प्रशासनाला आजही आठ वर्षा नंतर या बाबतीत यश आले नाही. ही रुखरुख भाविकांच्या मनाला कायम बोचरी ठरणारी आहे.

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी