शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:40 IST

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही

ठळक मुद्देआठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे झाली चोरीयोगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने

- अविनाश मुडेगांवकर 

 अंबाजोगाई - ‘चोरी केली की देव पाप देतो’ ही प्रचलित असलेली म्हण मात्र अंबाजोगाईकरांसाठी खोटीच ठरली. जिथे देवच सुरक्षित राहिला नाही. तिथे माणसांचं काय? असा प्रश्न श्री योेगेश्वरी देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी, यातील निर्दोष सुटलेले आरोपी यावरून निर्माण झाला आहे. 

 आठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे चोरट्यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले. दिवेआगार व अंबाजोगाई येथील झालेल्या या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे काहूर माजले होते. चोरीचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डी. वाय मंडलिक यांनी स्वत:कडे घेतला होता. दागिने चोरणारे चोर पकडून आणावेत या मागणीसाठी अंबाजोगाईत बंद, मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी भाविकांनी रोष व्यक्त केला होता. दागिन्यांविना देवी पाहणे भाविकांना न रुचल्याने चोरी गेलेल्या दागिन्यांपेक्षा तिप्पट दागिने भक्तांनी देवीला अर्पण केले. भाविकांची सोनेरी श्रद्धा देवीला भरभरून देऊन गेली. कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही  चोरांचा तपास लावा, ही मागणी पुढे करीत देवीच्या दागिन्यांसाठी स्वत: हातात परडी घेऊन मदत फेरी अंबाजोगाई शहरातून काढली होती. एक सच्चा भक्त म्हणून मुंडेंनी तीन लक्ष रुपये परडीत जमा केले व उर्वरित रक्कम स्वत:ची घालून देवीला दागिने अर्पण केले.  देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी व केज विधानसभेची पोटनिवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याने दागिन्यांच्या चोरीला राजकीय भांडवल म्हणून त्यावेळीच्या निवडणुकीत पाहिले गेले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. तत्कालिन मंत्री सुरेश धस, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ देवीला दागिने अर्पण केले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा तपास हा कळीचा मुद्दा बनला होता. अंबाजोगाई व दिवेआगार येथील झालेली चोरी , दोन्ही चोरीतील आरोपी  एकच असावेत असा कयास पोलिस प्रशासनाने बांधला व सलग दोन महिले विविध ठिकाणच्या आरोपींना चौकशीसाठी बोलावून धाडसत्र सुरूच राहिले. 

प्रशासनाचा दट्ट्या पोलिसांवर राहिल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशा अनेक घटना या कालवाधीत घडल्या. मात्र खरे चोर कोण? हा प्रश्न अजूनही निर्दोष सुटलेल्या आरोपींमुळे गुलदस्त्यातच राहिला आहे.  दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील पोलिसांनी पकडलेले आरोपी हे खरे आरोपी नाहीत याबाबत लोकमतने आवाज उठविला होता. अन् ती शंका न्यायालयाच्या निकालानंतर खरी ठरली. तब्बल एक वर्षे पोलिस तपास झाला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांना चोरांना शिक्षांना व्हावी व दागिने परत मिळावेत अशी अपेक्षा बाळगून होते. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. चोरीची घटना होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरीही पोलिस प्रशासनाला आजही आठ वर्षा नंतर या बाबतीत यश आले नाही. ही रुखरुख भाविकांच्या मनाला कायम बोचरी ठरणारी आहे.

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी