शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

बीडमध्ये १६ गावांतील ‘जलयुक्त शिवार’ची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देपंचायत समिती नरेगाचा गोंधळ चव्हाट्यावर; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. त्याअंतर्गत नदी, नाले खोलीकरण व खोदकाम, तसेच बांध-बंदिस्तीसारखे विविध उपक्रम घेण्यात येतात. बीड तालुक्यात २७ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश झालेला आहे. त्यापैकी काही कामे कृषी विभाग, जिल्हा परिषद करत आहे. तर पंचायत समिती नरेगा अंतर्गत १६ गावांत ११२ कामांना मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी ८२ कामांना अद्याप सुरूवातच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आॅनलाईन रेकॉर्डला मात्र ही कामे सुरू असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात मात्र या १६ गावांमध्ये कामेच सुरू नसल्याचे समोर आले आहे. यातील काही कामे मार्च अखेरीस पूर्ण होेणे अपेक्षित होते, परंतु नरेगा विभागाच्या गलथान कारभारामुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे याच २७ गावांमघ्ये तालुका कृषी विभागामार्फत सुरू असलेले जलयुक्तची कामे गतीने सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले. याचा फायदाही गावासह शेतकºयांना झाल्याचे ते म्हणाले. जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यांचे वर्क कोड काढून कृषी विभागाकडे वर्ग करून ही कामे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान प्रत्यक्षात बंद असलेली कामे आॅनलाईन रेकॉर्डला चालू दाखविण्यात आल्याने बीड पंचायत समितीच्या नरेगा विभागातील गलथान कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.कायमस्वरूपी ‘बीडीओ’ नसल्याने अडचणीपंचाय समितीमध्ये मागील काही दिवसांपासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाहीत. राजेंद्र तुरूकमारे यांच्याकडे पदभार येऊन काही महिनेच झाले होते. त्यानंतर नरेगा मधील विहीर कामांमध्ये अनियमितता असल्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते. या प्रकारानंतर तुरूकमारे हे रजेवर गेले. त्यानंतर बीडीओ पदाचा अतिरिक्त पदभार नरेगाचे सुधीर भागवत यांच्याकडे सोपावला. वारंवार अधिकाºयांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे कामे रखडण्याबरोबरच चालु कामांना गती मिळण्यास अडचणी येत आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी बीडीओ नियूक्त करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.खाजगी लोकांचा हस्तक्षेप वाढलामागील काही दिवसांपासून पंचायत समिती चर्चेत आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते व इतर खाजगी व्यक्तींचा कार्यालयात वावर वाढला आहे. एवढेच नव्हे तर शासकीय कामांमध्येही ते हस्तक्षेप करू लागले आहेत. एखादा अधिकारी, कर्मचारी बोलण्यास गेल्यावर अरेरावीची भाषा करून दबाव आणला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी दबावाखाली आहेत. हा हस्तक्षेप थांबवून कार्यालयातील कामे गतीने करावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाzpजिल्हा परिषदPoliceपोलिसStudentविद्यार्थी