शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात हजारामागे ३० तरूण नैराश्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:24 IST

कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा आदी कारणांचा समावेश; हेल्पलाईनचीही होते मदत

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आले आहे. तरूणांबरोबरच शेतकरी व इतर नैराश्यात असलेल्या रुग्णांना प्रेरणा प्रकल्पात समुपदेशन करून उपचार केले जात आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक तीन महिन्याला आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. प्रत्येकाच्या घरी जात त्यांच्या घरात किती लोक तणावाखाली आहेत, याची माहिती घेतली जाते. जे लोक तणावात आहेत, अशांना तात्काळ १०४ या क्रमांकावर संपर्क करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील रुग्णाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मनपरिवर्तन केले जाते.

शेतकरीही तणावाखालीऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एक लाखामागे २३४ शेतकºयांना (२०१७ ची आकडेवारी) नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत.या शेतक-यांचेही समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत.

आष्टी तालुक्यात सर्वाधिक संख्याआष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ रूग्ण तणावग्रस्त आढळून आले आहेत.त्यापाठोपाठ अंबाजोगाई (४९) अािण शिरूरकासार (२३) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.बीड, धारूर, केज, माजलगाव, परळी, पाटोदा व वडवणी येथे एकही तीव्र नैराश्यात असलेला रूग्ण नसल्याचा अहवाल आशा स्वयंसेविकांनी प्रेरणा प्रकल्पाला दिला आहे.

२० ते ३० वर्षांतील तरुणांमध्ये सर्वाधिक नैराश्यनैराश्यात असलेले सर्वाधिक तरूण हे २० ते ३० वयोगटातील आहेत. तसेच मागील काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि पुढील प्रवेशासाठी होणारी अडवणूक यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रकरणे येताच प्रेरणा प्रकल्पाकडून कुटुंब व पीडितांची तात्काळ भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना आत्महत्येपासूनदूर करण्यामध्ये यश आले आहे.

तो म्हणतो.. आता आत्महत्या नको रे बाबा...साधारण महिन्यापूर्वी एक रुग्ण या प्रकल्पात आला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी नकार दिला. यामुळे त्याने रागाच्या भरात काचेने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर लगेच त्याचे समुपदेशन करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाची टीम पोहोचली. मुलासह त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. आज तोच तरूण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करीत आहे. आता आत्महत्या करणार नाही, असे तो सांगत आहे. अशाच अनेक तरूणांचे मनपरिवर्तन करण्यात पे्ररणाच्या टिमला यश आले आहे.ग्रामीणपेक्षा शहरात प्रमाण आधिकग्रामीण भागात १०० मागे दोन ते तीन तरूण नैराश्यात आहेत. शहरात १०० मागे तीन ते चार तरूण नैराश्यग्रस्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.ही टिम घेतेय परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर सुदाम मोगले, डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, सामाजिक कार्यकर्ता अंबादास जाधव, परिचारिका प्रियंका भोंडवे, शीतल टाक, लेखापाल महेश कदम ही टीम या प्रकल्पात कार्यरत आहेत. समुपदेशन, उपचार आणि सर्व्हेक्षणाचा आढावा हे करीत आहेत. सध्या त्यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा