शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

बीड जिल्ह्यात हजारामागे ३० तरूण नैराश्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:24 IST

कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा आदी कारणांचा समावेश; हेल्पलाईनचीही होते मदत

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आले आहे. तरूणांबरोबरच शेतकरी व इतर नैराश्यात असलेल्या रुग्णांना प्रेरणा प्रकल्पात समुपदेशन करून उपचार केले जात आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक तीन महिन्याला आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. प्रत्येकाच्या घरी जात त्यांच्या घरात किती लोक तणावाखाली आहेत, याची माहिती घेतली जाते. जे लोक तणावात आहेत, अशांना तात्काळ १०४ या क्रमांकावर संपर्क करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील रुग्णाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मनपरिवर्तन केले जाते.

शेतकरीही तणावाखालीऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एक लाखामागे २३४ शेतकºयांना (२०१७ ची आकडेवारी) नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत.या शेतक-यांचेही समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत.

आष्टी तालुक्यात सर्वाधिक संख्याआष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ रूग्ण तणावग्रस्त आढळून आले आहेत.त्यापाठोपाठ अंबाजोगाई (४९) अािण शिरूरकासार (२३) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.बीड, धारूर, केज, माजलगाव, परळी, पाटोदा व वडवणी येथे एकही तीव्र नैराश्यात असलेला रूग्ण नसल्याचा अहवाल आशा स्वयंसेविकांनी प्रेरणा प्रकल्पाला दिला आहे.

२० ते ३० वर्षांतील तरुणांमध्ये सर्वाधिक नैराश्यनैराश्यात असलेले सर्वाधिक तरूण हे २० ते ३० वयोगटातील आहेत. तसेच मागील काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि पुढील प्रवेशासाठी होणारी अडवणूक यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रकरणे येताच प्रेरणा प्रकल्पाकडून कुटुंब व पीडितांची तात्काळ भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना आत्महत्येपासूनदूर करण्यामध्ये यश आले आहे.

तो म्हणतो.. आता आत्महत्या नको रे बाबा...साधारण महिन्यापूर्वी एक रुग्ण या प्रकल्पात आला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी नकार दिला. यामुळे त्याने रागाच्या भरात काचेने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर लगेच त्याचे समुपदेशन करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाची टीम पोहोचली. मुलासह त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. आज तोच तरूण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करीत आहे. आता आत्महत्या करणार नाही, असे तो सांगत आहे. अशाच अनेक तरूणांचे मनपरिवर्तन करण्यात पे्ररणाच्या टिमला यश आले आहे.ग्रामीणपेक्षा शहरात प्रमाण आधिकग्रामीण भागात १०० मागे दोन ते तीन तरूण नैराश्यात आहेत. शहरात १०० मागे तीन ते चार तरूण नैराश्यग्रस्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.ही टिम घेतेय परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर सुदाम मोगले, डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, सामाजिक कार्यकर्ता अंबादास जाधव, परिचारिका प्रियंका भोंडवे, शीतल टाक, लेखापाल महेश कदम ही टीम या प्रकल्पात कार्यरत आहेत. समुपदेशन, उपचार आणि सर्व्हेक्षणाचा आढावा हे करीत आहेत. सध्या त्यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा