शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

बीड जिल्ह्यात हजारामागे ३० तरूण नैराश्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:24 IST

कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा आदी कारणांचा समावेश; हेल्पलाईनचीही होते मदत

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आले आहे. तरूणांबरोबरच शेतकरी व इतर नैराश्यात असलेल्या रुग्णांना प्रेरणा प्रकल्पात समुपदेशन करून उपचार केले जात आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक तीन महिन्याला आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. प्रत्येकाच्या घरी जात त्यांच्या घरात किती लोक तणावाखाली आहेत, याची माहिती घेतली जाते. जे लोक तणावात आहेत, अशांना तात्काळ १०४ या क्रमांकावर संपर्क करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील रुग्णाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मनपरिवर्तन केले जाते.

शेतकरीही तणावाखालीऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एक लाखामागे २३४ शेतकºयांना (२०१७ ची आकडेवारी) नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत.या शेतक-यांचेही समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत.

आष्टी तालुक्यात सर्वाधिक संख्याआष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ रूग्ण तणावग्रस्त आढळून आले आहेत.त्यापाठोपाठ अंबाजोगाई (४९) अािण शिरूरकासार (२३) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.बीड, धारूर, केज, माजलगाव, परळी, पाटोदा व वडवणी येथे एकही तीव्र नैराश्यात असलेला रूग्ण नसल्याचा अहवाल आशा स्वयंसेविकांनी प्रेरणा प्रकल्पाला दिला आहे.

२० ते ३० वर्षांतील तरुणांमध्ये सर्वाधिक नैराश्यनैराश्यात असलेले सर्वाधिक तरूण हे २० ते ३० वयोगटातील आहेत. तसेच मागील काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि पुढील प्रवेशासाठी होणारी अडवणूक यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रकरणे येताच प्रेरणा प्रकल्पाकडून कुटुंब व पीडितांची तात्काळ भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना आत्महत्येपासूनदूर करण्यामध्ये यश आले आहे.

तो म्हणतो.. आता आत्महत्या नको रे बाबा...साधारण महिन्यापूर्वी एक रुग्ण या प्रकल्पात आला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी नकार दिला. यामुळे त्याने रागाच्या भरात काचेने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर लगेच त्याचे समुपदेशन करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाची टीम पोहोचली. मुलासह त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. आज तोच तरूण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करीत आहे. आता आत्महत्या करणार नाही, असे तो सांगत आहे. अशाच अनेक तरूणांचे मनपरिवर्तन करण्यात पे्ररणाच्या टिमला यश आले आहे.ग्रामीणपेक्षा शहरात प्रमाण आधिकग्रामीण भागात १०० मागे दोन ते तीन तरूण नैराश्यात आहेत. शहरात १०० मागे तीन ते चार तरूण नैराश्यग्रस्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.ही टिम घेतेय परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर सुदाम मोगले, डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, सामाजिक कार्यकर्ता अंबादास जाधव, परिचारिका प्रियंका भोंडवे, शीतल टाक, लेखापाल महेश कदम ही टीम या प्रकल्पात कार्यरत आहेत. समुपदेशन, उपचार आणि सर्व्हेक्षणाचा आढावा हे करीत आहेत. सध्या त्यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा