शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीड जिल्हा रुग्णालयात तपासणी १० रुपयांत; औषधांसाठी मात्र हजारो रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:55 IST

सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतात, हा समज बीड जिल्हा रूग्णालयात साफ चुकीचा ठरत आहे. तपासणी जरी दहा रूपयांत होत असली तरी औषधोपचाराला मात्र हजारो रूपये मोजावे लागत आहेत. सध्या रूग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देऔषध तुटवड्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भूर्दंड, तर औषध विक्रेत्यांची चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतात, हा समज बीड जिल्हा रूग्णालयात साफ चुकीचा ठरत आहे. तपासणी जरी दहा रूपयांत होत असली तरी औषधोपचाराला मात्र हजारो रूपये मोजावे लागत आहेत. सध्या रूग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य रूग्णांना सहन करावा लागत असून रूग्णालय परिसरातील मेडिकलधारकांना सोन्याचे दिवस आले आहेत.

जिल्हा रूग्णालयात येणारे ९० टक्के रूग्ण हे ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटूंबातील असतात. १ व २ नंबरच्या कक्षात १० रूपयांची चिठ्ठी घेत तपासणीसाठी रांगेत उभा राहतात. दिवसभरात जवळपास दीड ते दोन हजार रूग्ण बाह्य रूग्ण विभागात आपल्या आजारांची तपासणी करून घेतात. येथील डॉक्टरही त्यांची प्रामाणिक तपासणी करतात. त्यानंतर त्यांना १० रूपयांची काढलेल्या चिठ्ठीवर औषधांची लांबलचक यादी लिहून दिली जाते आणि ८ क्रमांकाच्या खिडकीतून घ्या, असे सांगितले जाते. सरकारी दवाखाना असल्याने औषधांसाठी पैसे लागत नाहीत, म्हणून घरून केवळ तिकीटापूरते पैसे घेऊन आलेले रूग्ण व नातेवाईक ८ क्रमांकाच्या खिडकीसमोर रांगेत उभा राहतात.

फार्मासिस्टच्या हातात चिठ्ठी देताच ते ‘आपल्याकडे हे औषध नाही, बाहेरून घ्यावे लागेल’ असे सांगत चिठ्ठीवर फुल्ली मारून रिकामे होतात. रिकाम्या खिशाने आलेल्या रूग्ण व नातेवाईकांना काय करावे हे समजत नाही. चिठ्ठीवरील लांबलचक औषधांची लाईन पाहून त्यांना धडकी भरते. किती पैसे लागतील, याची माहिती नसते. रूग्णालयाच्या बाहेर असलेल्या मेडिकलवर गेल्यावर त्यांनी बिल हाती ठेवताच सर्वसामान्यांना चक्कर येत आहे.

एकीकडे रूग्णालयात दहा रूपयांत तपासणी होत असली तरी तुटवडा असल्याने औषधांसाठी हजारो रूपये मोजावे लागत आहेत. ही भयावह परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाही आरोग्य विभाग मात्र सुस्तच आहे. जिल्हा रूग्णालय प्रशासनही आम्हाला औषधी खरेदी करण्याचा अधिकार नाही, असे सांगून हात झटकत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे ‘मरण’ येत आहे. जिल्हा रूग्णालयात तात्काळ औषधी उपलब्ध करून सर्वसामान्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क केला. त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. परंतु त्यानंतर संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी बंद येत होता. तसेच अतिरीक्त जिल्हा शल्यकित्सक डॉ.सतीष हरीदास यांचाही संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेलीनाही.सर्दी, खोकल्याच्या औषधांचाही तुटवडामोठ्या आजारांचे तर सोडाच परंतु सर्दी, खोकल्याच्या औषधांसाठी रूग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. तसेच अपघात विभागात आल्यानंतर आलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठीही जिल्हा रूग्णालयाकडे अपुरी यंत्रणा असल्याचे समोर आले आहे. याचा फटका रूग्णांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणे! माध्यमांना माहिती देऊ नकाशासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचू देऊ नका, त्यांना याबाबत काहीच सांगू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच स्थानिक अधिकारी, कर्मचारी दबावामुळे ही माहिती देण्यास टाळाटाळ करतात.