शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बीड जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला फुलकिडे तर सोयाबीनला अळीचा शाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 7:05 PM

खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.

बीड : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या बोंडअळी तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिकावर शेंगातील अळी मोठ्या प्रमाणावर दिसत असल्यामुळे  उत्पादनात घट होण्याची भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कृषी विभागाकडून जिल्हाभरात पिकांवरील कीड, रोग, अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांसमोर बोंडअळी रोखण्याचे आवाहन आहे. ज्या  महसूल मंडळामध्ये अधिक प्रमाणात बोंडअळी, फुलकिडे व शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी  उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना फवारणी करताना औषधांचे प्रमाण, मिश्रण कसे करावे इ. विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

बोंडअळीनंतर फुलकिड्यांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे हे कीडे कापसाच्या पानातील रस शोषून घेतात. परिणामी पानाचा आकार द्रोणासारखा होत असून, पाने लालसर रंगाची होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय, अशी शंका येत आहे. पानातील रस शोषून घेतल्यामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत.  मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पिके येतील काय ? तसेच फवारणीवर झालेला खर्च वाया जातो काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

सोयाबीन पिकावर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे कापसासोबत सोयाबीनचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोयाबीनच्या शेंगा येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळापासूनच कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय केले तर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

फुलकिडे रोखण्यासाठी उपाययोजनाफेप्रोनील ३० एमएल १० लिटर पाण्यामध्ये मिसळावे. या मिश्रणामध्ये १२ : १६ : ०० हे खत २०० ग्रॅम तसेच मॅग्नेशियम ५० ग्रॅम फवारणी केल्यानंतर पानावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव थांबून पाने लालसर होत नाहीत. सोयाबीन पिकावरील शेंगातील अळी रोखण्यासाठी इमामेक्टीनबेंझाईन ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरूरचे कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी दिली. अधिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग व विद्यापीठाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती