शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बीड शहराचे वैभव ‘बिंदुसरा, कर्परा’ नद्या सांडपाण्यामुळे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:41 IST

दररोज सव्वा दोन कोटी घाण पाणी जाते नद्यांच्या पात्रात

ठळक मुद्देसर्वत्र घाणीचे साम्राज्य खड्डे खोदून ठेवल्याने नदीपात्र धोकादायक

बीड : शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा व कर्परा या दोन नद्यांमध्ये शहरातून निघणारे सर्व सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे या नद्यांचे पात्र दूषित झाले आहे. तसेच पात्राची स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेच्या माहितीनुसार दररोज २ कोटी २० लक्ष लिटर सांडपाणी बीड शहरातून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व पाणी दोन नद्यांमध्ये सोडले जाते.

बीड शहरातून बिंदुसरा व कर्परा या दोन नद्या वाहतात. अतिक्रमणे, कचरा आदी कारणांमुळे आगोदरच पात्र अरूंद झालेले आहेत. त्यामुळे पुर आल्यावर पाणी शहरात येते. सध्या बीड शहरातून दररोज २२ एमएलडी सांडपाणी दोन नद्यांमध्ये येते. दोन्ही नद्या वाहत्या नसल्याने या पाण्यांचे डोह साचत आहेत. त्यामुळे पात्र घाण होऊन सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. या संदर्भात बीड  पालिकेकडून नदी पात्राची स्वच्छता केली जात नाही. बार्शी नाका परिसरात तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे नदीपात्र धोकादायक झाले आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन्ही नद्यांचे पात्र स्वच्छ करुन सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी बीडकरांमधून होत आहे.

भुयारी गटार योजनेचे काम संथबीड शहरात भुयारी गटार योजनेच्या कामाला जुलै २०१८ पासून सुरूवात झाली. एकूण १६५ कोटी रूपयांचा निधी असलेले हे काम १६३ किलोमिटरचे आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३० किमी काम पूर्ण झाल्याने पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सांडपाणी नद्यांमध्ये जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यातबीड शहरात नाल्या, रस्ते आदी समस्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही. मार्ग मिळत नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. घाणीचे साम्राज्य पसरत आहे. डासांची उत्पत्ती होऊन साथरोगांना निमंत्रण मिळत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे.

बीड शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सध्या शहरात दररोज २२ एमएलडी सांडपाणी बाहेर येते. - राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा न.प.बीड

टॅग्स :Beedबीडriverनदीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण