शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

'सोयाबीन हातचे गेले..मुलीचे लग्न कसे करायचे'; धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:52 AM

अंबाजोगाई तालुक्यातील घटना 

ठळक मुद्दे मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होतीरविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

अंबाजोगाई (जि. बीड) : कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दु:ख मराठवाडा वारंवार सहन करीत असतानाच आता परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान सहन न होऊन शेतकऱ्यांचा हृदयविकाराने अंत होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रकाश कारभारी चोरमले (४५) या शेतकऱ्याचा सोमवारी असाच मृत्यू झाला. रविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. 

पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चोरमले यांना अडीच एकर शेती होती. पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब पावसाचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे. मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत हा शेतकरी मागील दोन दिवसांपासून होता. रात्री झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाहीत ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे निपचित पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. प्रकाश यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. या प्रकरणी स्वाराती रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीत नोंद झाली असून प्रकरण पुढील तपासासाठी बर्दापूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. व्हिसेरा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.- डॉ. विश्वजित पवार, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, स्वाराती, अंबाजोगाई

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूRainपाऊसBeedबीडagricultureशेती