शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

बीडमध्ये १३ महिन्यांत १० ठिकाणी अनधिकृत पुतळे; रात्रीतूनच चौकाला नाव अन् पुतळ्याची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:35 IST

रात्रीतूनच पुतळा उभारायचा किंवा चौकाला नाव द्यायचे, असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे दोन समाजात, गटात वाद होत आहेत.

बीड : महापुरुष, आदर्श व्यक्ती यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असावा. त्यांच्या स्मृतींची आठवण राहावी, यासाठी पुतळे उभारले जातात; परंतु त्यासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवरून परवानगी घेणे आवश्यक असते. मागील १३ महिन्यांत कोणीही असे केलेले नाही. उलट अनधिकृतपणे चौक, पुतळे उभा करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. १० ठिकाणी असे प्रकार घडले होते. त्यातील सहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा संवेदनशील प्रकरणांत बांधकाम विभाग अथवा महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधीने फिर्याद देणे आवश्यक असते; परंतु पोलिसांनीच पुढाकार घेतला.

सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०२७ रोजी शासन निर्णय काढून पुतळा धोरण ठरवले. यात महापुरुष, आदर्श व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविली. पुतळ्याच्या परवानगीसाठी आलेले प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहात असल्याने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर समिती तयार केली. यात सर्व कागदपत्रे घेऊन परवानगी देण्यास सांगितले; परंतु जिल्ह्यात असे कोणीही करताना दिसत नाही. रात्रीतूनच पुतळा उभारायचा किंवा चौकाला नाव द्यायचे, असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे दोन समाजात, गटात वाद होत आहेत. तसेच अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी असे प्रकार कोणीही करणार नाही, यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच ज्यांनी असे केले आहे, त्यांच्याविरोधात तक्रार देणेही तितकेचे गरजेचे आहे.

तक्रार देण्यासही आखडता हातगाव किंवा शहरी भागात उभारलेले पुतळे हे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ग्रामसेवक, तलाठी यांच्या अखत्यारित येतात. जागेचे मालक हेच विभाग असतात. त्यामुळे त्यांच्या जागेत असे अनधिकृत पुतळे उभारल्यास महसूल अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे; परंतु असे करण्यास हे विभाग आखडता हात घेतात. जरी तक्रार दिली तरी अज्ञात लोक, असे सांगतात. वादात पडायचे नको? या हेतून मोगम तक्रार दिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१० पैकी सहा गुन्हे दाखल२०२४ व जानेवारी २०२५ या काळात जिल्ह्यात १० ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारण्यात आले. यामध्ये चार प्रकरणांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांनीच फिर्याद दिली, तर बांधकाम विभाग व ग्रामसेवकांनी दोन प्रकरणांत फिर्याद दिली चार ठिकाणी, तर तक्रार देण्यासही कोणी आले नाही.

समितीत कोण असते?शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात. पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य असतात. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतात.

पुतळा उभारण्यासाठी २१ सूचनापुतळा उभारण्यासाठी शासनाने समितीला २१ मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. कायदा व सुव्यवस्था, शपथपत्र, परवागनी, ना-हरकत आदींचा यात समावेश आहे. २ मे २०१७ च्या शासन निर्णयात याचा स्पष्ट उल्लेख आहे.

परवानगी घेऊन उभारावापुतळा उभारणे, चौक करणे यासाठी रीतसर परवानगी घ्यावी. अशा संवेदनशील प्रकरणात भावना दुखावणे, विटंबना होण्यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मागील १३ महिन्यांत १० ठिकाणी असे प्रकार घडले. चार प्रकरणांत पोलिस फिर्यादी आहेत. इतर विभागांनीही पुढे येऊन जबाबदारी घेत तक्रार देणे आवश्यक आहे. तसेच पुतळा उभारण्याला आमचा विरोध नाही; परंतु तो नियमानुसार आणि परवानगी घेऊन उभारावा. चुकीच्या पद्धतीने केल्यास आम्ही कारवाई करू.नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड.

अशी आहे अनधिकृत पुतळ्यांची आकडेवारीजानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५बसलेले पुतळे १०पोलिस फिर्यादी ४बांधकाम विभाग फिर्यादी १ग्रामसेवक फिर्यादी १गुन्हे दाखल नसलेेले पुतळे ४.. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी