शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

बीडमध्ये १३ महिन्यांत १० ठिकाणी अनधिकृत पुतळे; रात्रीतूनच चौकाला नाव अन् पुतळ्याची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:35 IST

रात्रीतूनच पुतळा उभारायचा किंवा चौकाला नाव द्यायचे, असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे दोन समाजात, गटात वाद होत आहेत.

बीड : महापुरुष, आदर्श व्यक्ती यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असावा. त्यांच्या स्मृतींची आठवण राहावी, यासाठी पुतळे उभारले जातात; परंतु त्यासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवरून परवानगी घेणे आवश्यक असते. मागील १३ महिन्यांत कोणीही असे केलेले नाही. उलट अनधिकृतपणे चौक, पुतळे उभा करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. १० ठिकाणी असे प्रकार घडले होते. त्यातील सहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा संवेदनशील प्रकरणांत बांधकाम विभाग अथवा महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधीने फिर्याद देणे आवश्यक असते; परंतु पोलिसांनीच पुढाकार घेतला.

सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०२७ रोजी शासन निर्णय काढून पुतळा धोरण ठरवले. यात महापुरुष, आदर्श व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविली. पुतळ्याच्या परवानगीसाठी आलेले प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहात असल्याने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर समिती तयार केली. यात सर्व कागदपत्रे घेऊन परवानगी देण्यास सांगितले; परंतु जिल्ह्यात असे कोणीही करताना दिसत नाही. रात्रीतूनच पुतळा उभारायचा किंवा चौकाला नाव द्यायचे, असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे दोन समाजात, गटात वाद होत आहेत. तसेच अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी असे प्रकार कोणीही करणार नाही, यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच ज्यांनी असे केले आहे, त्यांच्याविरोधात तक्रार देणेही तितकेचे गरजेचे आहे.

तक्रार देण्यासही आखडता हातगाव किंवा शहरी भागात उभारलेले पुतळे हे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ग्रामसेवक, तलाठी यांच्या अखत्यारित येतात. जागेचे मालक हेच विभाग असतात. त्यामुळे त्यांच्या जागेत असे अनधिकृत पुतळे उभारल्यास महसूल अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे; परंतु असे करण्यास हे विभाग आखडता हात घेतात. जरी तक्रार दिली तरी अज्ञात लोक, असे सांगतात. वादात पडायचे नको? या हेतून मोगम तक्रार दिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१० पैकी सहा गुन्हे दाखल२०२४ व जानेवारी २०२५ या काळात जिल्ह्यात १० ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारण्यात आले. यामध्ये चार प्रकरणांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांनीच फिर्याद दिली, तर बांधकाम विभाग व ग्रामसेवकांनी दोन प्रकरणांत फिर्याद दिली चार ठिकाणी, तर तक्रार देण्यासही कोणी आले नाही.

समितीत कोण असते?शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात. पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य असतात. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतात.

पुतळा उभारण्यासाठी २१ सूचनापुतळा उभारण्यासाठी शासनाने समितीला २१ मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. कायदा व सुव्यवस्था, शपथपत्र, परवागनी, ना-हरकत आदींचा यात समावेश आहे. २ मे २०१७ च्या शासन निर्णयात याचा स्पष्ट उल्लेख आहे.

परवानगी घेऊन उभारावापुतळा उभारणे, चौक करणे यासाठी रीतसर परवानगी घ्यावी. अशा संवेदनशील प्रकरणात भावना दुखावणे, विटंबना होण्यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मागील १३ महिन्यांत १० ठिकाणी असे प्रकार घडले. चार प्रकरणांत पोलिस फिर्यादी आहेत. इतर विभागांनीही पुढे येऊन जबाबदारी घेत तक्रार देणे आवश्यक आहे. तसेच पुतळा उभारण्याला आमचा विरोध नाही; परंतु तो नियमानुसार आणि परवानगी घेऊन उभारावा. चुकीच्या पद्धतीने केल्यास आम्ही कारवाई करू.नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड.

अशी आहे अनधिकृत पुतळ्यांची आकडेवारीजानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५बसलेले पुतळे १०पोलिस फिर्यादी ४बांधकाम विभाग फिर्यादी १ग्रामसेवक फिर्यादी १गुन्हे दाखल नसलेेले पुतळे ४.. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी