शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:23 IST

सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते.

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी-कधी अवकाळी.. यामुळे शेती व्यवसायाला जुगार खेळण्याजोगेच मानले जाते. मात्र, तालुक्यातील पाडळसिंगी येथे दीड एकरात विहीर खोदून राज्यात चर्चेत आलेले मारुती बजगुडे हे तीन वर्षे दुष्काळ पडला, तरी ५० एकर शेती हिरवीगार करू शकतात. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी कोरड्या दुष्काळावर कायमची मात केली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीडमध्ये होतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती तोट्यात चालली आहे. पाऊस कमी पडला तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून, सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली.

या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू ठेवले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. शिवाय माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते.

मत्स्यपालनाचे नियोजनदरम्यान, दुरून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असून, बजगुडे यांनी आपल्या १२ एकरपैकी ८ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून, या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांना मानस आहे.

आता उत्पन्न वाढेल सततच्या दुष्काळाला कंटाळून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरू केले तेव्हा महाकाय विहीर खोदणे शक्य होईल का? अशी शंका होती. पण, अडचणींवर मात करीत काम पूर्ण झाले. यामुळे आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असा विश्वास आहे.- मारोती बजगुडे, शेतकरी, पाडळसिंगी (ता. गेवराई)

 

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी