शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:23 IST

सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते.

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी-कधी अवकाळी.. यामुळे शेती व्यवसायाला जुगार खेळण्याजोगेच मानले जाते. मात्र, तालुक्यातील पाडळसिंगी येथे दीड एकरात विहीर खोदून राज्यात चर्चेत आलेले मारुती बजगुडे हे तीन वर्षे दुष्काळ पडला, तरी ५० एकर शेती हिरवीगार करू शकतात. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी कोरड्या दुष्काळावर कायमची मात केली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीडमध्ये होतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती तोट्यात चालली आहे. पाऊस कमी पडला तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून, सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली.

या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू ठेवले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. शिवाय माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते.

मत्स्यपालनाचे नियोजनदरम्यान, दुरून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असून, बजगुडे यांनी आपल्या १२ एकरपैकी ८ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून, या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांना मानस आहे.

आता उत्पन्न वाढेल सततच्या दुष्काळाला कंटाळून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरू केले तेव्हा महाकाय विहीर खोदणे शक्य होईल का? अशी शंका होती. पण, अडचणींवर मात करीत काम पूर्ण झाले. यामुळे आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असा विश्वास आहे.- मारोती बजगुडे, शेतकरी, पाडळसिंगी (ता. गेवराई)

 

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी