शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:23 IST

सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते.

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी-कधी अवकाळी.. यामुळे शेती व्यवसायाला जुगार खेळण्याजोगेच मानले जाते. मात्र, तालुक्यातील पाडळसिंगी येथे दीड एकरात विहीर खोदून राज्यात चर्चेत आलेले मारुती बजगुडे हे तीन वर्षे दुष्काळ पडला, तरी ५० एकर शेती हिरवीगार करू शकतात. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी कोरड्या दुष्काळावर कायमची मात केली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीडमध्ये होतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती तोट्यात चालली आहे. पाऊस कमी पडला तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून, सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली.

या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू ठेवले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. शिवाय माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते.

मत्स्यपालनाचे नियोजनदरम्यान, दुरून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असून, बजगुडे यांनी आपल्या १२ एकरपैकी ८ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून, या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांना मानस आहे.

आता उत्पन्न वाढेल सततच्या दुष्काळाला कंटाळून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरू केले तेव्हा महाकाय विहीर खोदणे शक्य होईल का? अशी शंका होती. पण, अडचणींवर मात करीत काम पूर्ण झाले. यामुळे आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असा विश्वास आहे.- मारोती बजगुडे, शेतकरी, पाडळसिंगी (ता. गेवराई)

 

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी