शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीडमध्ये ठेकेदाराप्रमाणे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ठेवणार घरकुलाच्या बांधकामावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:19 IST

विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे.

बीड : विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे. २७ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पाच दिवसांत कामे पूर्ण केले नाहीत, तर कारवाईचा इशाराही दिला आहे. सीईओंच्या या अजब फतव्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटत आहे.

एकीकडे शिक्षकांच्या खांद्यावर शैक्षणिक दर्जा वाढवण्याची मुख्य जबाबदारी असताना त्यांच्या मागे अशा प्रकारची शिक्षणबाह्य कामे लादण्यात येतात. शैक्षणिक जबाबदारी सोडून इतर कोणत्याही कामांची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी वेळोवेळी केली होती. मात्र, नुसत्या आश्वासनांवर बोळवण करून शासनाने या शिक्षकांच्या हातांवर तुरी दिल्याचे चित्र आहे. रमाई योजनेच्या माध्यमातून २०१६-१७ मधील घरकुल योजनेमधील घरे पूर्ण करून घेण्याचे व २०१७-१८ साठी शिल्लक राहिलेले प्रस्ताव घेण्याचे शासन आदेशात म्हटले आहे.

यानुसार मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची पूर्णवेळ नेमणूक केल्याचे आदेश जि.प कडून देण्यात आले आहेत. तसेच अपूर्ण बांधकामांसाठी  लागणारे साहित्य, गवंडी, तसेच प्रशासकीय मदत करून घरकुलधारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून पंचायत समिती स्तरावरील अडचणी दूर करण्याचे तसेच बँकेशी संपर्क साधून आर्थिक नियोजन लावून रमाई योजनेतील घरकुलांचे बांधकाम २ एप्रिलपर्यंत पूर्ण करून घेण्याचे आदेश जि. प. कडून देण्यात आले आहेत. तसेच कामे पूर्ण झाली नाही तर सर्वस्वी जबाबदार धरून कारवाई करण्याची तंबी देखील सीईओ येडगे यांनी आदेशातून दिली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

असे कामे देणे योग्य नाहीशिक्षणबाह्य कामे शिक्षकांना देऊ नये, ही मागणी वेळोवेळी केली. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही. उलट असे आदेश काढले जातात. शाळेमध्ये सध्या परीक्षेचे दिवस आहेत. याकाळात असे कामे देणे योग्य नाही.

- राजेंद्र खेडकर, केंद्रप्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, बीड

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाHomeघरTeacherशिक्षक