शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बीड शहरातून विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:56 AM

शाळेत जाणा-या आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब वेळीच मुलीच्या लक्षात आल्याने तिने त्यांच्यापासून पळ काढत वसतिगृह गाठले. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली.

ठळक मुद्देप्रसंगावधान राखून काढला पळ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शाळेत जाणा-या आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब वेळीच मुलीच्या लक्षात आल्याने तिने त्यांच्यापासून पळ काढत वसतिगृह गाठले. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली.

प्रकरणी समाजकल्याण अधिका-यांसह मुलगी व तिचे आई-वडील यांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. या घटनेने शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुनीता (नाव बदलले आहे) ही सामाजिक न्याय विभागाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या मुलींच्या वसतिगृहात राहते. शहरातील भगवान विद्यालयात ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. रोज ती शाळेत सायकलवरून जात असे. परंतु मंगळवारी तिची सायकल खराब झाली होती. त्यामुळे ती पायी निघाली होती. माने कॉम्प्लेक्स परिसरात आल्यावर तिला दुचाकीवरून आलेल्या जोडप्याने ‘तुला शाळेत सोडतो’ असे म्हणत दुचाकीवर बसण्यास सांगितले. परंतु अनोळखी असल्याने मुलीने दुचाकीवर बसण्यास नकार देत पुढे निघून गेली. परंतु या जोडप्याने तिचा पाठलाग केला. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करताच सुनीताने आरडाओरडा करीत वसतिगृहाकडे पळ काढला.

वसतिगृहात आल्यावर महिला अधीक्षकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ सुनीताच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. ही माहिती तात्काळ वरिष्ठांना न देता दडपून ठेवण्याचा प्रयत्न अधीक्षकांकडून करण्यात आला होता. परंतु काही लोकांना याची माहिती समजली आणि त्यांनी सहायक आयुक्तांच्या कानावर घातली. त्यांनी तात्काळ माहिती घेत कारवाईचे आदेश दिले.

त्यानंतर सकाळी घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी सायंकाळी सहा वाजले. त्यामुळे वसतिगृह अधीक्षकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी तसेच वसतिगृहाच्या सुरक्षिततेबद्दल प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.पोलिसांकडून चौकशीला सुरुवाततक्रार अर्ज प्राप्त होताच पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक देवकर यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे देवकरांसह त्यांची टीम रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी करीत होती. मुलीलाही विश्वासात घेऊन तिच्याकडून काही धागादोरा मिळतोय का, याबाबत विचारपूस करीत होते.

सुरक्षितता ऐरणीवरमागील काही दिवसांपासून छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शहरासह प्रत्येक तालुक्यात दामिनी पथकांची नियुक्ती केली. त्यामुळे काही प्रमाणात मुलींच्या मनातील भीती दूर झाली आहे. परंतु मंगळवारी सकाळी अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्रत्येकवेळी पोलिसांवरच अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच अशा घटनांना आळा बसेल.आयुक्त ठाण्यात दाखलही घटना समजताच सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी वसतिगृहात धाव घेत मुलीची विचारपूस केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ते स्वत: मुलीला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले. येथे त्यांनी रीतसर अर्ज केला. पोलिसांनी हा अर्ज चौकशीवर ठेवला आहे.अर्ज आला आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकारी, कर्मचारी पाठविले आहेत. तपासणी, चौकशी करून तात्काळ पुढील कारवाई केली जाईल.- नानासाहेब लाकाळ,पोनि. शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीडप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी सांगितले आहे. -डॉ.सचिन मडावीसहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड