शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:23 IST

यशकथा :  मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

- अविनाश कदम (आष्टी (जि. बीड))

बीड जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कर्हे वडगावचे मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

१९९५ पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी  नवनवीन प्रयोगांचा शोध घेत सांगळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती घेतली. कृषी प्रदर्शनातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मागील १० वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि अनियमिततेमुळे पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याला योग्य  भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीमध्ये बदलाचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये सांगळे यांनी ७ एकर शेतीमध्ये साई सरबती वाणाची  लिंबोणीची ७०० झाडे लावली.  यापासून जवळपास २० लाखांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये १७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. त्यानंतर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या झाल्या. २०१० मध्ये त्यांनी फळबागेत संत्री लावली. केवळ संत्रीच्या भरवशावर न राहता आंतरपिकांतूनही उत्पन्न मिळविण्याची इच्छा झाली. यात  मिरची, वांगीसारखी आंतरपिके घेत पूरक उत्पन्न प्राप्त केले.

झाडांना फळे भरत असताना २०१२-१३ मध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करत चार महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. फळबागेतून योग्य मोबदला मिळू लागल्याने त्यांनी उर्वरित शेतीमध्ये वेगवेगळ्या  फळबागांचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या सीताफळाच्या बाळानगरी आणि धारूर अशा विविध सहा जातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली. केशर वाणाचे आंबे आणि नारळाची प्रत्येकी ५०- ५० झाडे लावली. पावसाच्या लहरीपणामुळे त्यांनी या फळबागांना लागणाऱ्या पाण्यासाठी तीन विहिरी, पाच बोअरवेल घेतले; परंतु तरीही पाण्याची  कमतरता भासू लागल्याने १५० ते २०० मीटरचे शेततळे केले. जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या शेततळ्याने सध्याच्या दुष्काळात पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केल्याचे मारुती सांगळे म्हणाले.

६५ वर्षांचे मारुती सांगळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मजुरांच्या सहाय्याने ही सर्व कामे पाहतात. ते फळबागांना पूर्णपणे सेंद्रिय, जैविक, कोंबडी खतांचा वापर करतात. त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यांनी गांडूळ खताचाही प्रकल्प सुरू केला आहे. यापुढे चंदनाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्कार मिळविणारे सांगळे म्हणतात, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिकतेची कास धरावी. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कितीही कर्ज  झाले तरीही न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट व प्रयत्न करत राहिले  पाहिजे. यामुळे अशक्य ते शक्य होण्याला वेळ लागत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी