शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:23 IST

यशकथा :  मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

- अविनाश कदम (आष्टी (जि. बीड))

बीड जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कर्हे वडगावचे मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

१९९५ पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी  नवनवीन प्रयोगांचा शोध घेत सांगळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती घेतली. कृषी प्रदर्शनातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मागील १० वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि अनियमिततेमुळे पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याला योग्य  भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीमध्ये बदलाचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये सांगळे यांनी ७ एकर शेतीमध्ये साई सरबती वाणाची  लिंबोणीची ७०० झाडे लावली.  यापासून जवळपास २० लाखांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये १७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. त्यानंतर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या झाल्या. २०१० मध्ये त्यांनी फळबागेत संत्री लावली. केवळ संत्रीच्या भरवशावर न राहता आंतरपिकांतूनही उत्पन्न मिळविण्याची इच्छा झाली. यात  मिरची, वांगीसारखी आंतरपिके घेत पूरक उत्पन्न प्राप्त केले.

झाडांना फळे भरत असताना २०१२-१३ मध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करत चार महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. फळबागेतून योग्य मोबदला मिळू लागल्याने त्यांनी उर्वरित शेतीमध्ये वेगवेगळ्या  फळबागांचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या सीताफळाच्या बाळानगरी आणि धारूर अशा विविध सहा जातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली. केशर वाणाचे आंबे आणि नारळाची प्रत्येकी ५०- ५० झाडे लावली. पावसाच्या लहरीपणामुळे त्यांनी या फळबागांना लागणाऱ्या पाण्यासाठी तीन विहिरी, पाच बोअरवेल घेतले; परंतु तरीही पाण्याची  कमतरता भासू लागल्याने १५० ते २०० मीटरचे शेततळे केले. जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या शेततळ्याने सध्याच्या दुष्काळात पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केल्याचे मारुती सांगळे म्हणाले.

६५ वर्षांचे मारुती सांगळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मजुरांच्या सहाय्याने ही सर्व कामे पाहतात. ते फळबागांना पूर्णपणे सेंद्रिय, जैविक, कोंबडी खतांचा वापर करतात. त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यांनी गांडूळ खताचाही प्रकल्प सुरू केला आहे. यापुढे चंदनाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्कार मिळविणारे सांगळे म्हणतात, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिकतेची कास धरावी. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कितीही कर्ज  झाले तरीही न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट व प्रयत्न करत राहिले  पाहिजे. यामुळे अशक्य ते शक्य होण्याला वेळ लागत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी