शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:23 IST

यशकथा :  मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

- अविनाश कदम (आष्टी (जि. बीड))

बीड जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कर्हे वडगावचे मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

१९९५ पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी  नवनवीन प्रयोगांचा शोध घेत सांगळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती घेतली. कृषी प्रदर्शनातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मागील १० वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि अनियमिततेमुळे पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याला योग्य  भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीमध्ये बदलाचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये सांगळे यांनी ७ एकर शेतीमध्ये साई सरबती वाणाची  लिंबोणीची ७०० झाडे लावली.  यापासून जवळपास २० लाखांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये १७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. त्यानंतर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या झाल्या. २०१० मध्ये त्यांनी फळबागेत संत्री लावली. केवळ संत्रीच्या भरवशावर न राहता आंतरपिकांतूनही उत्पन्न मिळविण्याची इच्छा झाली. यात  मिरची, वांगीसारखी आंतरपिके घेत पूरक उत्पन्न प्राप्त केले.

झाडांना फळे भरत असताना २०१२-१३ मध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करत चार महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. फळबागेतून योग्य मोबदला मिळू लागल्याने त्यांनी उर्वरित शेतीमध्ये वेगवेगळ्या  फळबागांचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या सीताफळाच्या बाळानगरी आणि धारूर अशा विविध सहा जातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली. केशर वाणाचे आंबे आणि नारळाची प्रत्येकी ५०- ५० झाडे लावली. पावसाच्या लहरीपणामुळे त्यांनी या फळबागांना लागणाऱ्या पाण्यासाठी तीन विहिरी, पाच बोअरवेल घेतले; परंतु तरीही पाण्याची  कमतरता भासू लागल्याने १५० ते २०० मीटरचे शेततळे केले. जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या शेततळ्याने सध्याच्या दुष्काळात पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केल्याचे मारुती सांगळे म्हणाले.

६५ वर्षांचे मारुती सांगळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मजुरांच्या सहाय्याने ही सर्व कामे पाहतात. ते फळबागांना पूर्णपणे सेंद्रिय, जैविक, कोंबडी खतांचा वापर करतात. त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यांनी गांडूळ खताचाही प्रकल्प सुरू केला आहे. यापुढे चंदनाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्कार मिळविणारे सांगळे म्हणतात, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिकतेची कास धरावी. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कितीही कर्ज  झाले तरीही न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट व प्रयत्न करत राहिले  पाहिजे. यामुळे अशक्य ते शक्य होण्याला वेळ लागत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी