शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:23 IST

यशकथा :  मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

- अविनाश कदम (आष्टी (जि. बीड))

बीड जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कर्हे वडगावचे मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

१९९५ पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी  नवनवीन प्रयोगांचा शोध घेत सांगळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती घेतली. कृषी प्रदर्शनातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मागील १० वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि अनियमिततेमुळे पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याला योग्य  भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीमध्ये बदलाचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये सांगळे यांनी ७ एकर शेतीमध्ये साई सरबती वाणाची  लिंबोणीची ७०० झाडे लावली.  यापासून जवळपास २० लाखांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये १७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. त्यानंतर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या झाल्या. २०१० मध्ये त्यांनी फळबागेत संत्री लावली. केवळ संत्रीच्या भरवशावर न राहता आंतरपिकांतूनही उत्पन्न मिळविण्याची इच्छा झाली. यात  मिरची, वांगीसारखी आंतरपिके घेत पूरक उत्पन्न प्राप्त केले.

झाडांना फळे भरत असताना २०१२-१३ मध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करत चार महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. फळबागेतून योग्य मोबदला मिळू लागल्याने त्यांनी उर्वरित शेतीमध्ये वेगवेगळ्या  फळबागांचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या सीताफळाच्या बाळानगरी आणि धारूर अशा विविध सहा जातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली. केशर वाणाचे आंबे आणि नारळाची प्रत्येकी ५०- ५० झाडे लावली. पावसाच्या लहरीपणामुळे त्यांनी या फळबागांना लागणाऱ्या पाण्यासाठी तीन विहिरी, पाच बोअरवेल घेतले; परंतु तरीही पाण्याची  कमतरता भासू लागल्याने १५० ते २०० मीटरचे शेततळे केले. जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या शेततळ्याने सध्याच्या दुष्काळात पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केल्याचे मारुती सांगळे म्हणाले.

६५ वर्षांचे मारुती सांगळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मजुरांच्या सहाय्याने ही सर्व कामे पाहतात. ते फळबागांना पूर्णपणे सेंद्रिय, जैविक, कोंबडी खतांचा वापर करतात. त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यांनी गांडूळ खताचाही प्रकल्प सुरू केला आहे. यापुढे चंदनाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्कार मिळविणारे सांगळे म्हणतात, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिकतेची कास धरावी. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कितीही कर्ज  झाले तरीही न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट व प्रयत्न करत राहिले  पाहिजे. यामुळे अशक्य ते शक्य होण्याला वेळ लागत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी