शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दुष्काळाने वसवले गावाशेजारी दुसरे अस्थायी समांतर गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:52 PM

तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देमूळ गाव सोडून छावण्यालाच आले गावपण : चहापाण्यासाठी थाटली हॉटेल, टपऱ्या

विजयकुमार गाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे. त्यांच्या देखभालीसाठी माणसांची वर्दळ गावापेक्षा छावणीवर जास्त दिसून येत आहे.सध्या लोकसभेच्या प्रचाराची धूम सुरू आहे. त्यात मतदारांच्या गळाभेटीसाठी या समांतर गावातच प्रचारकांना जावे लागत आहे.अनेक वेळा दुष्काळ पाहिला. अनुभवला परंतु असा दुष्काळ कधी पाहिला नव्हता. संपूर्ण तालुकाच कोरडाठाक पडला. शेतीला सोडा, जिथे जनावरांना आणि माणसाला पिण्यासाठी लागणारे पाणी टँकरच्या माध्यमातून शेजारच्या तालुक्यात आयात करण्याची लाजिरवाणी वेळ प्रत्यक्षात अनुभवायला आली आहे.किमान पन्नास किलो मीटर अंतर पाणी वाहतुकीसाठी पाण्याएवढे इंधन वापरावे लागत आहे. पाण्याबरोबर तालुक्यातील चारा संपुष्टात आला. शेतकरी पूर्णत: परावलंबी बनला. जनावर दावणीला राहतील किंवा नाही या भीतीने त्रस्त होता. छावण्या हाच एकमेव पर्याय असलेल्याने मागणी जोर धरत होती. अखेर चालण्याचे दरवाजे उघडले गेले. पाहता पाहता दिवसागणिक हा आकडा वाढत गेला.गुरूवारी हाती आलेल्या आकड्यानुसार ४९ असून पैकी एक छावणी सुरू नसली तरी ४८ छावण्यांमधील राहत जनावरांची संख्या ३ हजार १८५ तर मोठ्या जनावरांची संख्या ३० हजार ४३ अशी एकूण ३३ हजार २२८ इतके पशुधन छावणीवर असल्याने छावण्या दुसरे गाव दिसू लागले. तर जनावरांच्या चारा पाण्यासाठी किमान दोन माणसे असल्याने गावात कमी छावणीवर जास्त वर्दळ आहे. म्हणून अनायासे जिथे माणसे तिथे प्राथमिक गरजा भागवण्यासाठी चहापाण्याचे छोटी हॉटेल, तंबाखू, सुपारी, बिडी काडी अशा किरकोळ गरजा पूर्ण करणारे अस्थाई दुकान तकलादू सावली तयार करुन सुरु आहेत. मध्यंतरी वादळी वाºयासह गारांचा मार खाण्याची वेळ निभावून गेली तरी तापत्या उन्हाबरोबर अचानक येणारे वारे बेचैन करून सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत हे समांतर गाव जिथल्या तिथे दिसणार आहेत.सध्या लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्याने पक्षीय प्रचारक माणूस माणूस शोधून मतांचे दान पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यासाठी त्यांनाही छावण्यावरचे हे विचित्र विश्व पाहणे भाग पडत आहे.आचारसंहिता पथकाला दिला गुंगारानिवडणुका आदर्श आचारसंहितेच्या तत्वप्रणालीनुसार व्हाव्यात यासाठी प्रशासकीय स्तरावर स्वतंत्र निगराणी करत आहे. याउपरही त्या पथकाला ही गुंगारा देऊन आपले प्रचार तंत्र वापरले जाते. त्यासाठी मार्गाने - आडमार्गाने लोकशाहीतील निवडणूक जिंकण्याची पराकाष्ठा केली जात आहे.छावणीचालकांची दमछाकनियमांना बांधील राहून जनावरांना चारा पाणी, खुराक वेळेवर देणे बंधनकारक आहे. चौकशी तपासणी पथक भेटी, तालुक्याबाहेरून चारा पाणी आणणे हे काम करीत असताना चालकांची दमछाक होते ही गोष्ट नाकारता येत नाही. स्वीकारलेले काम नियमबाह्य होता कामा नये, हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण दुष्काळ हा सेवा करण्याची संधी आहे, मेवा मिळवण्याचा व्यवसाय नाही.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र