शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:23 IST

माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगावला पाणी टंचाईच्या भीषण झळा  सोसाव्या लागत आहेत. गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी आज (दि.१७ ) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

आनंदगावची लोकसंख्या जवळपास 4 हजारावर आहे. मागील अनेक वर्षापासून गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या गावात टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो खुप अपूरा आहे. यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 'घागर मोर्चा' काढण्यात आला. गावचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजलगाव धरणातून पाईप लाईन करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोर्चामध्ये महिलांसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चाdroughtदुष्काळMajalgaon Damमाजलगाव धरणBeedबीड