शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 09:43 IST

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये सभा घेत आहेत.

बीड-  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. आता या सभेला प्रत्युत्तर म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेणार आहेत. या सभेची बीडमध्ये जोरदार तयारी केली आहे. या सभेचा टीझरही लाँच केला असून या टीझरमध्ये खासदार शरद पवार यांचा फोटोही वापरण्यात आलेला नाही. 

बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत. 

या सभेच्या अगोदर अजित पवार गटातील नेते खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तटकरे म्हणाले, बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात उद्याच्या बीडच्या सभेने होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

२ जुलैला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी एकत्रित बसून सामुदायिक निर्णयातून एनडीएमध्ये आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात आमच्या नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ५ जुलैला एमएटीच्या मेळाव्यात आम्ही घेतलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी राज्याला अजितदादा पवार यांनी सांगितली. आमची धर्मनिरपेक्षता ही मूळविचारधारा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र व राज्याची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राला अधिक गतीमान पध्दतीने विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आणि राज्यातील महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. हा निर्णय घेत असताना घटनात्मक कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करतानाच जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाची सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आमचे सर्व मंत्री भूमिका बजावत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे